शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

पशुसंवर्धन विभाग नसल्यात जमा

By admin | Updated: May 27, 2016 00:39 IST

शेतीला पर्याय म्हणून जिल्ह्यातील गोधनाला चालना मिळावी व त्यातून दुग्धोत्पादन वाढावे, गोधनाच्या आरोग्याची काळजी घेता यावी,...

धोरण फसल्याची स्थिती : अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचितअमरावती : शेतीला पर्याय म्हणून जिल्ह्यातील गोधनाला चालना मिळावी व त्यातून दुग्धोत्पादन वाढावे, गोधनाच्या आरोग्याची काळजी घेता यावी, यासाठी जिल्हास्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्यात. मात्र कार्यालयाकडून एकही धोरणात्मक कार्यक्रम प्रभावीरित्या राबविला जात नसल्याने पशुपालकांची अवस्था छत्र हरविलेल्या अनाथांसारखी झाली आहे. पशुसंवर्धन विभाग गोधनाशी निगडित एकही योजना गांभीर्याने राबविली गेली नाही. त्यामुळे पशुपालकांसाठी शासनाकडून मिळणारा निधी मुरतो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. शेतीला पूक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची आस तेवढी शिल्लक राहिली आहे. दुग्धोत्पादन व्यतिरिक्त शेती अवजारे, बैलजोडी, दुधाळ संकलित गायी, म्हशी शेतकऱ्यांना वाटप केल्या जातात. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दरवर्षी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती योजनेमधून पात्र लाभार्थ्यांकडे अर्ज मागविण्यात येतात. दुधाळ संकरित गायी, म्हशीच्या वाटपासाठी दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला महिला बचतगटातील लाभार्थ्यांना योजनेत प्राधान्य राहते. यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील अर्ज केलेले. परंतु त्याची निवड व प्रशिक्षणातील संधी उपलब्ध न झालेले पात्र दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीदेखील विचारात घेतले जातात. सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के शासकीय अनुदानावर या योजना राबविल्या जातात. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान असते. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ संबंधित तालुका यांच्याकडे सादर करणे आवश्यक असते. या योजनांसाठी गरजू जिल्हा परिषदेकडे अर्जही करतात. परंतु खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नाविण्यपूर्ण योजनांचा निधी जातो कुठे, असा प्रश्न पशुपालक उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)