शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पशुसंवर्धन विभाग नसल्यात जमा

By admin | Updated: May 27, 2016 00:39 IST

शेतीला पर्याय म्हणून जिल्ह्यातील गोधनाला चालना मिळावी व त्यातून दुग्धोत्पादन वाढावे, गोधनाच्या आरोग्याची काळजी घेता यावी,...

धोरण फसल्याची स्थिती : अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचितअमरावती : शेतीला पर्याय म्हणून जिल्ह्यातील गोधनाला चालना मिळावी व त्यातून दुग्धोत्पादन वाढावे, गोधनाच्या आरोग्याची काळजी घेता यावी, यासाठी जिल्हास्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्यात. मात्र कार्यालयाकडून एकही धोरणात्मक कार्यक्रम प्रभावीरित्या राबविला जात नसल्याने पशुपालकांची अवस्था छत्र हरविलेल्या अनाथांसारखी झाली आहे. पशुसंवर्धन विभाग गोधनाशी निगडित एकही योजना गांभीर्याने राबविली गेली नाही. त्यामुळे पशुपालकांसाठी शासनाकडून मिळणारा निधी मुरतो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. शेतीला पूक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची आस तेवढी शिल्लक राहिली आहे. दुग्धोत्पादन व्यतिरिक्त शेती अवजारे, बैलजोडी, दुधाळ संकलित गायी, म्हशी शेतकऱ्यांना वाटप केल्या जातात. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दरवर्षी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती योजनेमधून पात्र लाभार्थ्यांकडे अर्ज मागविण्यात येतात. दुधाळ संकरित गायी, म्हशीच्या वाटपासाठी दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला महिला बचतगटातील लाभार्थ्यांना योजनेत प्राधान्य राहते. यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील अर्ज केलेले. परंतु त्याची निवड व प्रशिक्षणातील संधी उपलब्ध न झालेले पात्र दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीदेखील विचारात घेतले जातात. सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के शासकीय अनुदानावर या योजना राबविल्या जातात. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान असते. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ संबंधित तालुका यांच्याकडे सादर करणे आवश्यक असते. या योजनांसाठी गरजू जिल्हा परिषदेकडे अर्जही करतात. परंतु खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नाविण्यपूर्ण योजनांचा निधी जातो कुठे, असा प्रश्न पशुपालक उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)