शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

पशुसंवर्धन विभाग नसल्यात जमा

By admin | Updated: May 27, 2016 00:39 IST

शेतीला पर्याय म्हणून जिल्ह्यातील गोधनाला चालना मिळावी व त्यातून दुग्धोत्पादन वाढावे, गोधनाच्या आरोग्याची काळजी घेता यावी,...

धोरण फसल्याची स्थिती : अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचितअमरावती : शेतीला पर्याय म्हणून जिल्ह्यातील गोधनाला चालना मिळावी व त्यातून दुग्धोत्पादन वाढावे, गोधनाच्या आरोग्याची काळजी घेता यावी, यासाठी जिल्हास्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्यात. मात्र कार्यालयाकडून एकही धोरणात्मक कार्यक्रम प्रभावीरित्या राबविला जात नसल्याने पशुपालकांची अवस्था छत्र हरविलेल्या अनाथांसारखी झाली आहे. पशुसंवर्धन विभाग गोधनाशी निगडित एकही योजना गांभीर्याने राबविली गेली नाही. त्यामुळे पशुपालकांसाठी शासनाकडून मिळणारा निधी मुरतो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. शेतीला पूक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची आस तेवढी शिल्लक राहिली आहे. दुग्धोत्पादन व्यतिरिक्त शेती अवजारे, बैलजोडी, दुधाळ संकलित गायी, म्हशी शेतकऱ्यांना वाटप केल्या जातात. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दरवर्षी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती योजनेमधून पात्र लाभार्थ्यांकडे अर्ज मागविण्यात येतात. दुधाळ संकरित गायी, म्हशीच्या वाटपासाठी दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला महिला बचतगटातील लाभार्थ्यांना योजनेत प्राधान्य राहते. यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील अर्ज केलेले. परंतु त्याची निवड व प्रशिक्षणातील संधी उपलब्ध न झालेले पात्र दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीदेखील विचारात घेतले जातात. सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के शासकीय अनुदानावर या योजना राबविल्या जातात. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान असते. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ संबंधित तालुका यांच्याकडे सादर करणे आवश्यक असते. या योजनांसाठी गरजू जिल्हा परिषदेकडे अर्जही करतात. परंतु खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नाविण्यपूर्ण योजनांचा निधी जातो कुठे, असा प्रश्न पशुपालक उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)