शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत घट

By admin | Updated: April 19, 2015 00:19 IST

वरुड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

प्रकल्पात २५ ते ३० टक्केच जलसाठा : नद्याही पडल्या कोरड्यावरूड : वरुड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगस्टनंतरच पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नदीचा प्रवाहसुध्दा खंडित झाला आहे. पाणी वापर संस्थांनी वेळेआधीच पिकांना पाणी सोडण्यासाठी मागणी केल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे. तापत्या उन्हामुळे तापमानाच्या फरकाने प्रकल्पात केवळ २५ ते ३० टक्के जलसाठा आहे. येत्या काळात तीव्र पाणी टंचाईचे सूतोवाच सिंचन विभागाने केले आहे. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर एवढी आहे. पुसली प्रकल्पात जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पात पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ मीटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयन क्षमता ५००.७५ मिटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४८०.५० मिटर आहे. ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर ,जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर ,बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर,लोणी धवलगीरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पाची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. परंतु यावर्षी आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन नोव्हेंबरमध्ये केवळ ८५ टक्के होता. जानेवारीत ७० टक्के, फेब्रुवारीत ६० ते ६५ टक्के आणि मार्चमध्ये ३० ते ४० टक्के परंतु एप्रिलमध्ये तापमानात वाढ झाल्याने सदर जलसाठा केवळ २५ ते ३० टक्क्यांवरच आला आहे. त्यामुळे नद्यासुध्दा कोरड्या पडल्या आहेत. रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते तर नद्यांनासुध्दा पाणी सोडले होते. या व्यतिरिक्त काही गावांना पिण्याकरिता पाणीपुरवठासुध्दा केल्या जातो. याव्यतिरिक्त पाकनाला प्रकल्पाला दरवाजा बसलेला नसल्याने तांत्रिक दोषामुळे जलसंचयन होवू शकले नाही. नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेला वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सिंंचनाकरिता आवश्यक व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमिन संत्रा लागवडीखाली असून यापैकी १६ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी संत्रा झाडे आहे. रबी हंगामातील गहू, चना व संत्रा आणि कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येते. अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणी पुरवठ्यात तूट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)