शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

मृत्युपूर्व बयाण घेणे बंद

By admin | Updated: September 10, 2014 23:16 IST

महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

नायब तहसीलदार संघटनेचा निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला पत्रअमरावती : महसूल कामाचा ताण बघता गुन्हेगारीशी संबंधित दाखल रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविणे बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याकरिता अमरावती, भातकुली तालुक्यातील नायब तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी यांची संयुक्तपणे नेमणूक करण्यात आली आहे. चाकुहल्ला, विषप्राशन, भाजलेल्या रुग्णांचे मृत्युपूर्व बयाण नोंदविण्याची जबाबदारी नायब तहसीलदारांवर आहे; मात्र, काही दिवसांपासून तहसीलदार व नायब तहसीलदारांवर कामांची जबाबदारी वाढली आहे. काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत तहसीलअंतर्गत कामांचा ताण वाढत आहे. हे पाहता महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मृत्युपूर्व बयाण घेणे बंद केले आहे. २९ आॅगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीतील व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीच रुग्णांचे बयाण घेत आहेत. बयाण घेण्याविषयी तोडगा काढण्याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना भेटून समस्या कथन केल्या. या समस्येचे निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाला पत्राद्वारे कळविले आहे. मात्र अद्यापपर्यंत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेणार आहेत. त्यानंतर या समस्येचे निराकरण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पोलीसच घेतात बयाणइर्विन रुग्णालयात गुन्हेगारी घडामोडीत रुग्ण दाखल होताच त्यांचे मृत्युपूर्व बयाण घेण्याकरिता तहसीलदार व नायब तहसीलदार यांना फोन करुन बोलविण्यात येत होते. मात्र, त्यांनी २९ आॅगस्टपासून हे बयाण घेणे बंद केल्याने रुग्णांचे बयाण संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी नोंदवीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागाची जबाबदारी वाढली आहे.