शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

वृक्ष लागवडीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी

By admin | Updated: October 16, 2015 00:39 IST

शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत.

आदेश : ले-आऊटधारकांनासुध्दा वृक्षलागवड बंधनकारकचांदूरबाजार : शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घरे बांधताना घरासमोर वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. शिवाय ज्यांनी बांधकामापूर्वी वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेग्रामीण भागात शेतांच्या धुऱ्यावरील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाकूडतस्करीही वाढली आहे. प्रशासनातील अधिकारी यातून मालामाल होत आहेत. विशेषत: शहराच्या बाजूला ले-आऊट टाकताना झाडांची कत्तल केली जाते. हे ले-आऊट टाकण्याकरिता जमीन अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परवानगीकरिता अर्ज करण्यात येतो. शहरात घरे बांधताना नगरपरिषदेची व ग्रामीण भागात घराचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अनिवार्य आहे. समिती करणार देखरेखबांधकामापूर्वी झाडे लावली जातात की नाही, हे तपासण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांची समिती नेमली जाईल. शहरी भागात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीच्या पदाधिकाऱ्यांची समिती यासाठी गठित केली जाईल. संबंधिताने घर बांधणीपूर्वी वृक्ष लागवड केली किंवा नाही, याचा अहवाल या समितीला तपासून घ्यावा लागेल. तपासणीअंती संबंधित यंत्रणेने वृक्ष लागवडीपूर्वीच बांधकामाला परवानगी दिली असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावले जाईल. त्यानंतर त्यांचे निलंबन केले जाईल. (प्रतिनिधी)वृक्ष लागवडीचे जोडावे लागणार प्रमाणपत्रबांधकामाच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद, ग्रामपंचायतीकडे अर्ज करताना रिकाम्या जागेत वृक्षलागवड केल्याचे प्रमाणपत्र व वृक्षारोपणाचे छायाचित्रदेखील जोडावे लागणार आहे. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे शपथपत्रदेखील बांधकामाच्या परवानगीसाठी गरजेचे असणार आहे. परवानगी दिल्यानंतर वर्षभरात संबंधित यंत्रणा लावलेल्या झाडांची पाहणी करेल. पाहणीदरम्यान झाडे आढळून आली नाहीत तर चौकशी करुन संबंधित घरमालकाविरूध्द पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाईसंबंधी तक्रार केली जाईल.