शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी

By admin | Updated: October 16, 2015 00:39 IST

शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत.

आदेश : ले-आऊटधारकांनासुध्दा वृक्षलागवड बंधनकारकचांदूरबाजार : शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घरे बांधताना घरासमोर वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. शिवाय ज्यांनी बांधकामापूर्वी वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेग्रामीण भागात शेतांच्या धुऱ्यावरील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाकूडतस्करीही वाढली आहे. प्रशासनातील अधिकारी यातून मालामाल होत आहेत. विशेषत: शहराच्या बाजूला ले-आऊट टाकताना झाडांची कत्तल केली जाते. हे ले-आऊट टाकण्याकरिता जमीन अकृषक करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परवानगीकरिता अर्ज करण्यात येतो. शहरात घरे बांधताना नगरपरिषदेची व ग्रामीण भागात घराचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अनिवार्य आहे. समिती करणार देखरेखबांधकामापूर्वी झाडे लावली जातात की नाही, हे तपासण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांची समिती नेमली जाईल. शहरी भागात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीच्या पदाधिकाऱ्यांची समिती यासाठी गठित केली जाईल. संबंधिताने घर बांधणीपूर्वी वृक्ष लागवड केली किंवा नाही, याचा अहवाल या समितीला तपासून घ्यावा लागेल. तपासणीअंती संबंधित यंत्रणेने वृक्ष लागवडीपूर्वीच बांधकामाला परवानगी दिली असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावले जाईल. त्यानंतर त्यांचे निलंबन केले जाईल. (प्रतिनिधी)वृक्ष लागवडीचे जोडावे लागणार प्रमाणपत्रबांधकामाच्या परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद, ग्रामपंचायतीकडे अर्ज करताना रिकाम्या जागेत वृक्षलागवड केल्याचे प्रमाणपत्र व वृक्षारोपणाचे छायाचित्रदेखील जोडावे लागणार आहे. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे शपथपत्रदेखील बांधकामाच्या परवानगीसाठी गरजेचे असणार आहे. परवानगी दिल्यानंतर वर्षभरात संबंधित यंत्रणा लावलेल्या झाडांची पाहणी करेल. पाहणीदरम्यान झाडे आढळून आली नाहीत तर चौकशी करुन संबंधित घरमालकाविरूध्द पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाईसंबंधी तक्रार केली जाईल.