शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

दूषित पाणीपुरवठा आरोग्याला धोका

By admin | Updated: June 27, 2015 00:09 IST

दरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो.

तुरटीचे प्रमाण वाढविले : प्राधिकरणकडून उपाययोजना सुरुवैभव बाबरेकर अमरावतीदरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो. पाणी ढवळले गेल्याने ही स्थिती उत्पन्न होते. मात्र, यामुळे आजार बळावतात. सद्यस्थितीत शहरातील अनेक भागांत प्राधिकरणद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्याला घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात नदी, नाले, तलाव व अन्य जलस्त्रोतातील पाणी सिंभोरा धरणात जमा होते. यानंतर धरणाची पातळी हळूहळू वाढू लागते. सिंभोरा धरणाची जलपातळी मर्यादा ३४२.५० मीटर असून सद्यस्थितीत धरणात ३३८.९८ मीटर पाणी जमा झाले आहे. नवीन पाणी येत असल्याने पाणी ढवळले जात आहे. त्यामुळे खालचा गाळ वर येऊन गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सिंभोरा येथील हे पाणी अमरावतीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे आणले जाते. त्यानंतर जलशुध्दीकरण केंद्रावर ते शुध्द करून त्याचा अमरावतीकरांना पुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच प्रक्रिया अविरत सुरु आहे. ही स्थिती दरवर्षीच उद्भवते. दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठाजलशुध्दीकरण के्रंदावरून दररोज अमरावतीकरांना ११० दशलक्षलिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मजीप्राकडे जवळपास एक लाख ग्राहक असून सुमारे पाच लाख नागरिक पाणी पीत असल्याचे निदर्शनास येते. गढूळ पाण्यामुळे पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दरवर्षीच पहायला मिळते. पाण्याची गढुळता वाढताच तुरटीचे डोज वाढविण्यात येते. दरवर्षीच पावसाळ्यात धरणातील पाणी ढवळले जाते. अशावेळी अल्प प्रमाणात गढूळ पाणी दिसून येते. पाणी तपासणी करून ते पिण्यास योग्य असल्याची शहानिशा करूनच नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येते. - डी.एन. आमले, उपअभियंता(यांत्रिकी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.गढूळ पाण्यात जीवजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. दूषित पाण्यामुळे डायरिया व उलटी आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे गढूळ पाणी उकळून थंड करून प्यावे. या दिवसांत संसर्ग होण्याची भीती असते.- अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक.