शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठा आरोग्याला धोका

By admin | Updated: June 27, 2015 00:09 IST

दरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो.

तुरटीचे प्रमाण वाढविले : प्राधिकरणकडून उपाययोजना सुरुवैभव बाबरेकर अमरावतीदरवर्षी पाऊस पडल्यानंतर प्राधिकरणकडून गढूळ पाणीपुरवठा होतो. पाणी ढवळले गेल्याने ही स्थिती उत्पन्न होते. मात्र, यामुळे आजार बळावतात. सद्यस्थितीत शहरातील अनेक भागांत प्राधिकरणद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्याला घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात नदी, नाले, तलाव व अन्य जलस्त्रोतातील पाणी सिंभोरा धरणात जमा होते. यानंतर धरणाची पातळी हळूहळू वाढू लागते. सिंभोरा धरणाची जलपातळी मर्यादा ३४२.५० मीटर असून सद्यस्थितीत धरणात ३३८.९८ मीटर पाणी जमा झाले आहे. नवीन पाणी येत असल्याने पाणी ढवळले जात आहे. त्यामुळे खालचा गाळ वर येऊन गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सिंभोरा येथील हे पाणी अमरावतीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईनद्वारे आणले जाते. त्यानंतर जलशुध्दीकरण केंद्रावर ते शुध्द करून त्याचा अमरावतीकरांना पुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच प्रक्रिया अविरत सुरु आहे. ही स्थिती दरवर्षीच उद्भवते. दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठाजलशुध्दीकरण के्रंदावरून दररोज अमरावतीकरांना ११० दशलक्षलिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मजीप्राकडे जवळपास एक लाख ग्राहक असून सुमारे पाच लाख नागरिक पाणी पीत असल्याचे निदर्शनास येते. गढूळ पाण्यामुळे पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दरवर्षीच पहायला मिळते. पाण्याची गढुळता वाढताच तुरटीचे डोज वाढविण्यात येते. दरवर्षीच पावसाळ्यात धरणातील पाणी ढवळले जाते. अशावेळी अल्प प्रमाणात गढूळ पाणी दिसून येते. पाणी तपासणी करून ते पिण्यास योग्य असल्याची शहानिशा करूनच नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येते. - डी.एन. आमले, उपअभियंता(यांत्रिकी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.गढूळ पाण्यात जीवजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. दूषित पाण्यामुळे डायरिया व उलटी आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे गढूळ पाणी उकळून थंड करून प्यावे. या दिवसांत संसर्ग होण्याची भीती असते.- अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक.