शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

पोषण आहारावर अवलोकनार्थ समितीचा वॉच

By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST

शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे.

अमरावती : शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शासनाने याची दाखल घेऊन शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाची स्थापना केली आहे. त्यामार्फत जिल्ह्यातील शाळामधील आहाराची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे आता पोषण आहारातील गैरप्रकार दूर करून विद्यार्थ्यांपर्यंत आहार पोहचण्यास मदत होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांची सर्वांगिन वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. आहारातून विद्यार्थ्याच्या वाढीसाठी आवश्यक त्या कॅलरीजचा आहार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार देण्याचेही ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार शाळेतून आहार दिला जातो. पुरवठा विभागामार्फत शाळांना त्यासाठी तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत अन्य साहित्य पुरवले जाते. त्यातून शाळांनी नेमलेले स्वयंपाकी आणि मदतनिसांमार्फत आहार तयार करून दिला जातो. शाळेतून दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये सातत्य नसल्याची ओरड होते. त्याच बरोबर दिला जाणारा तांदूळ आणि अन्य साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचेही आरोप केले जातात. ज्या प्रमाणात आहार शिजवायचा आहे त्या प्रमाणात तो शिजवला जात नाही त्याचबरोबर तो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचेही शासनाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. याची दखल घेऊन आहाराच्या तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाची स्थापना केली आहे. या पथकामार्फत शाळांतील आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)