शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

‘चला बोलूया...नैराश्य टाळूया..’

By admin | Updated: April 7, 2017 00:17 IST

आज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

उपचार शक्य : वेगवान जीवनशैलीमुळे वाढताहेत मनोविकार वैभव बाबरेकर  अमरावतीआज ७ एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करीत आहोेत. बदलत्या काळानुरूप आरोग्याच्या बदलत्या संकल्पनांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. याअनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने यंदा ‘चला बोलूया..नैराश्य टाळूया’ हे घोषवाक्य घेतले असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. तल्लख मेंदुच्या बळावर जगताना मानवाने अनेक नवे सुखकारक बदल घडवून आणलेत. बुद्धीच्या बळावर विज्ञानाला गुलाम बनवून एका नवीन समाजव्यवस्थेचा जन्म झाला. त्यामुळे मानवाची झपाट्याने प्रगती झाली. या नव्या समाजव्यवस्थेत अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोेबर आणखीही बरेच काही मानवाला मिळाले. पण, मोबदल्यात शरीराचे आरोग्य आणि मनाचे समाधान मात्र हिरावून घेतले. म्हणूनच िप्रत्येकाला आज कुठे ना कुठे्, कधी ना कधी नैराश्याचा सामना करावा लागतो. आयुष्यातील इतर सकारात्मक गोष्टी विसरून फक्त नकारात्मक परिस्थितीला उराशी कवटाळून ठेवणे म्हणजे नैराश्य. मर्यादेपलिकडे दु:खाला ताणून धरणे म्हणजे नैराश्य. त्यामुळेच निराशा हे आजारी मनाचे प्राथमिक लक्षण असते. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत ‘नैराश्य आजारा’वर विशेष मोहीम राबविणार असून जिल्हा शल्य चिकित्सक अरूण, मानसोपचार तज्ज्ञ अमोल गुल्हाने, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता दीपक ठाकरे हे विशेष मोहीम राबवित आहेत.नैराश्याची प्रमुख दोन लक्षणेसतत उदास वाटणे, कोणत्याही कामात मन न लागणे, ही नैराश्य या आजाराची दोन प्रमुख लक्षणे आहेत. सोबतच झोप न लागणे, एकाग्रता, आत्मविश्वास कमी होणे, अस्वस्थता, आत्महत्येचे विचार मनात सातत्याने घोळणे, ही लक्षणे देखील आढळून येतात. जेव्हा-जेव्हा व्यक्ती मनोविकृतीने पछाडते तेव्हा एक गोष्ट निश्चित दिसून येते ती म्हणजे रूग्णाचे व कुटुंबियांचे किंवा त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांचे बिघडलेले संबंध पूर्ववत चांगले होत नाहीत तोवर ही स्थिती अशीच राहते. यासाठी रूग्णाला औषधोपचारासोबतच समुपदेशन व कुटुंबियांना रूग्णांच्या पुनर्वसनाबाबत माहिती देणे गरजेचे असेत.