शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Updated: May 17, 2015 00:46 IST

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

कधी आभाळ तर कधी उन्हाचा तडाखा : ताप, सर्दी, खोकल्याचे आजार वाढले, आबालवृध्द हैराणइंदल चव्हाण अमरावतीवातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या जीवसृष्टीला वातावरणानुसार जगण्याची सवय पडलेली आहे. त्यात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वातावरणाशी समरस होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती प्रबळ आहे, त्यांना अशा आजारांवर मात करणे शक्य होते. परंतु सर्वांना ते शक्य नसल्यामुळे काहींना आजाराचा सामना करावा लागतो. या वर्षात उन्हाळा फारसा तापलाच नाही. ऊन तापालयला सुरूवात झाली नि ४० डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले की ढगाळ वातावरण, गारपीटसदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात अचानक बदल घडत गेले. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असाच यावर्षीच्या उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून ग्रामीण भागासह शहरातदेखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.वातावरणातील अचानकपणे होत असलेल्या बदलामुळे दैनंदिन सवयीत बदल होत असल्यामुळे शरीराच्या व्यवस्थापनात बदल होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घशाचा आजार उद्भवतात. तसेच लहान मुलांना वातावरणाशी समरस होण्याची सवय नसते. त्यांना वेगवेगळ्या ऋतुचा अनुभव नसतो. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण तर शनिवारी सकाळपासून कडक उन्हाचे चटके यामुळे थंड वातावरणातून अचानक तीव्र तापमानाशी समरस होणे अशक्य असते. त्यामुळे आजाराचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात अधिक तापमान राहत असताना थंड पाणी, सरबत, ज्युश, पिण्यात येतात. कुलर, एसीमध्ये राहून शरीराला आवश्यक ते वातावरण निर्माण केले जातात. पण अचानक पाऊस आल्यास वातावरणात गारवा निर्माण होतो. त्यामुळे शरीराला झालेली सवय एकदम बदलणे शक्य नसते. परिणामी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. वातावरणातील बदलामुळे रोगाची लक्षणेउन्हाळ्याच्या दिवसांत तापमानाशी समरस होण्यासाठी कूलर, एसी, डक्टींग आदी कृत्रिम वातावरण निर्मिती केली जाते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे तापमानात घट होते व शरीराला कूलरची सवय लागल्याने आतील बदलामुळे प्रकृतीवर परिणाम जाणवतो. त्यामुळे वातावरण थंड असल्यास कूलरचा वापर थांबवा. तसेच तापमान वाढल्यास एसी, कूलरची हवा घेत असताना तत्कार बाहेर पडू नये.झालेल्या बदलामुळे काय काळजी घ्यावी ?उन्हात अधिक काळ बाहेर फिरणे टाळावे, पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करुन प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. उन्हातून आल्याबरोबर थंड पदार्थ सेवन करू नका. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साकरीनचे प्रमाण किती असतात याची माहिती घ्या. पण शक्यतोवर असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य राहील.डॉक्टर काय म्हणतात ?१उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण वाढू शकते. जमिनीतील पाणी काही प्रमाणात दूषित होते. या पाण्यामुळे डायरियासारखे आजारांचे प्रमाण वाढते. वर्षातील तीनही ऋतूंत वेगवेगळ्या वातावरणाशी सजीव समरस होतो. सवयीनुसार ते शक्य होते. मात्र अचानक बदलाचा विपरीत परिणाम होऊन आरोग्य धोक्यात येते.-डॉ. वसंत लुंगे, प्राध्यापक, डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज.२वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहे. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरूवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो. -अशोक वणकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.३या दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे. -स्वप्निल सोनोने, जनरल फिजिशिएशन.४मानवी शरीरात मिठाचे प्रमाण असते. ते वातावरणानुसार कमी-अधिक होतात. ऋतू बदलामुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यात ज्यांची प्रतिकारशक्ती सशक्त आहे तो या वातावरणाशी समरस होतो. मात्र ज्याला ते शक्य नसते असे लोक आजारी पडतात. त्यात मुले अधिक प्रमाणात आजारी पडतात. -उज्ज्वल बारंगे, जनरल फिजिशिएशन.