शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

बेलोरा विमानतळाचा वीज, पाण्याचा प्रश्न सुटला

By admin | Updated: November 13, 2015 00:21 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचा वीज, पाण्याचा प्रश्न सुटला असून त्याकरिता राज्य शासनाने १३ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचा वीज, पाण्याचा प्रश्न सुटला असून त्याकरिता राज्य शासनाने १३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. बेलोरा विमानतळाच्या परिसरात असलेली उच्चदाबाची वीजवाहिनी या निधीतून स्थलांतरित केली जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळाच्या विकासाचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.राज्य शासनाच्या धोरणानुसार विभागीय केंद्र असलेल्या ठिकाणी विमानतळ अनिवार्य आहे. त्यानुसार राज्याच्या सर्वच विभागीय स्तरावर विमानतळांची निर्मिती करून नियमित विमानसेवा सुरू आहे. मात्र, अमरावती विभागात फक्त अमरावतीत विमानतळ असले तरी येथे नियमित विमानसेवा सुरु नाही. त्यामुळे ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढ्यात ठेवली. जानेवारी २०१५ मध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बेलोरा विमानतळाच्या विकासासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. बैठकीला राज्य शासनाच्या विमानपतन विभागाचे सचिव मीना, आ. सुनील देशमुख, आ.रवी राणा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे जनरल मॅनेजर सी.एस.गुप्ता, सहायक महाप्रबंधक गुरावाला आदी उपस्थित होते. १३ कोटी मंजूर : यवतमाळ- अकोला वळणरस्ता निर्मितीचा गुंता कायमबेलोरा विमानतळाचा विकास, विस्तार करण्यासाठी विकास आरखडा तयार करण्यात आला आहे. जागेचा प्रश्न यापूर्वीच सोडविण्यात आला आहे. त्यामुळे येथून विमानसेवा कशी सुरू करता येईल, यावर सर्वाधिक भर दिला आहे. या महिन्यात विमानतळाच्या समस्येबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.- प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती.विमानतळावरून विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. एकदा विमानसेवा सुरु झाली की अनेक प्रश्न मार्गी लागतात. जानेवारीमध्ये विमानसेवा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने बैठक बोलावली आहे. विमान कंपन्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.- एम.पी.पाठक,प्रबंधक, बेलोरा विमानतळ.लहान विमाने सुरू करण्याचा प्रस्तावबेलोरा विमानतळावरुन चार ते नऊआसनी विमाने सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तासाभराच्या प्रवासासाठी अडीच हजार रुपये तिकिट दर आकारले जाणार आहे. नागपूर, चंद्रपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. लहान आसनी विमाने सुरु करणे तोट्याचे आहे. मात्र, हा तोटा भरुन काढण्यासाठी वाणिज्य विमान प्रवास तिकिटावर दोन टक्के अतिरिक्त कर आकारला जाईल. दोन टक्के करातून येणारी रक्कम ही लहान आसनी विमानसेवा कंपनीला दिली जाईल. हे धोरण जानेवारी २०१६ मध्ये शासन ठरविणार असल्याची माहिती आहे.