शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

केळी, सीताफळ, डाळिंब, पेरुच्या जोडीला शेवगाही

By admin | Updated: May 16, 2015 00:46 IST

पिढ्यानपिढ्या व्यवसाय शेतीच. परंतु परंपरागत शेतीला फाटा देत संत्रा, पेरू, डाळिंब, शेवगा व सीताफळांचे उत्पन्न घ्यायला ..

७० एकरांत संत्रा : निमखेड बाजारच्या संयुक्त रोंदळे कुटुंबाची यशोगाथागजानन मोहोड अमरावतीपिढ्यानपिढ्या व्यवसाय शेतीच. परंतु परंपरागत शेतीला फाटा देत संत्रा, पेरू, डाळिंब, शेवगा व सीताफळांचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. दरवर्षी उत्पन्न वाढवायला लागले. आता या शेती व्यवसायातून वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होत आहे. कुटुंबाच्या संयुक्त परिश्रमातून ११० एकरांत फळबागा फुलविणाऱ्या अंजनगाव सुर्जी तालुक्यामधील जगन्नाथराव रौंदळे परिवाराची यशोगाथा आजच्या समाजासाठी आदर्शवत आहे. रोंदळे परिवाराजवळ तशी १४८ एकर शेती आहे. यामध्ये ११० एकरांत फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रगत कृषिमंत्राचा वापर करुन या परिवाराने शेती ही एक प्रयोगशाळा बनविली आहे. शेतीमध्ये नवनवीन फळझाडांची लागवड करुन त्यांनी आपल्या भागात कुठलाही फलोत्पादन करु शकतो, हे सिध्द करुन दाखविला आहे. परिश्रमाला एकीचे बळ मिळाल्याने वैभव नांदते आहे. जगन्नाथरावांच्या परिवाराची दुसरी व तिसरी पिढी हे व्रत अंगीकारले आहे. जिल्ह्यात पेरुच्या बागा, तशा विरळच, परंतु या परिवाराने ५ एकरामध्ये जी-विलास वाणाच्या पेरूची झाडे लावली आहेत. हे रोप लखनौ येथून आणले. ३५ ते ४० रुपये प्रतिरोप असा खर्च आला. ६ बाय ८ फूट अंतरामध्ये ४ हजार ८०० रोपे लावलीत. गर जास्त बी कमी हे वाणाचे वैशिष्ट्ये आहे. आज या झाडांना दोन वर्षे झालीत. दीड वर्षांपासून बहर यायला सुरुवात होते. मागील वर्षी एक बहर त्यांनी घेतला. प्रत्येक झाडाला १० ते १२ किलोंची फळे आहेत. नागपूर मार्केटमध्ये २२ ते २५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. पहिला बहर हा उत्पादन खर्चात गेला आता झाडे मोठी होत आहे. तशी फळांची संख्याही वाढत आहेत. येणारा प्रत्येक बहर अधिकाअधिक उत्पन्न देणार आहे. वर्षाला पेरुचे दोन बहर घेता येतात. फळ तोडणी झाल्यानंतर झाडांची छाटणी करावी लागते. या छाटणीनंतर पुन्हा बहर येतो असे राहुल रौंदळे यांनी सांगितले. या फळपिकांसांठी प्रामुख्याने शेणखताचा वापर करण्यात येतो. या परिवाराने ७ एकरामध्ये बालानगर वाणाच्या जातीचे सीताफळ लागवड केली आहे. १० वर्षांपूर्वी धडासाने ही लागवड केली. १३ बाय १३ फूट अंतरावर झाडे लावलीत. सीताफळाला तसा उत्पादन खर्च कमी आहे. दरवर्षी एक बहर येतो, असे राहुलने सांगितले. ६ एकरामध्ये जी-नाईन या वाणाची केळी लावली. १४ रुपये प्रति बुंध्याप्रमाणे ९००० बुंधे लागलेत. वर्षभरात दोन बहर घेता येतात. दोन वर्षांचे पीक आहे. या वाणाचा बुंंधा जाडा असून फळे अधिक लागतात. अडीच एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. भगवा वाणाचे जालण्यावरुन रोपे आणली. १० बाय १५ फूट अंतरात लागवड केली. मागच्या वर्षी पहिला बहर घेतला. सध्या एका झाडाला १०० ते १२० फळे आहे. फळांचे वजन ७० ते १२० ग्रॅम पर्यंत आहे. याशिवाय एका एकरामध्ये शेवग्याची लागवड केली. झाडे ३ वर्षांची झाली आहेत. वर्षाला एक बहर येतो. तसा उत्पादनखर्च कमी येतो. मार्च ते जून महिन्यात उत्पादन होते. स्थानिक बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलोचा भाव मिळतो. या परिवाराच्या दुसऱ्या पिढीचे गणेशराव, रामेशराव, सुरेशराव, दिनेश व संजय असे ५ भाऊ संयुक्तपणे राहतात व शेतात राबतात. नवीन पिढीच्या राहुल याने शेती हाच व्यवसाय स्वीकारला आहे. संयुक्त परिवाराच्या परिश्रमाने रौंदळे परिवाराकडे वैभव नांदत आहे.