शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

परीक्षा समन्वयक नियुक्तीचा फज्जा

By admin | Updated: January 13, 2017 00:07 IST

परीक्षा विभागाशी निगडित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात ये-जा करण्याचा प्रसंग उद्भवूू नये,

प्राचार्यांची अनास्था : ४१० पैकी ८१ समन्वयकांचे काम समाधानकारकअमरावती : परीक्षा विभागाशी निगडित प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात ये-जा करण्याचा प्रसंग उद्भवूू नये, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात परीक्षा समन्वय नियुक्ती करण्याचे पत्र प्राचार्यांना पाठविल. मात्र त्या पत्राला प्राचार्यांनी फारशे गांभीर्याने घेतले नाही. केवळ ४१० पैकी ८१ समन्वयकांचेच काम समाधानकारक असल्याची माहिती हाती आली आहे.संत गाडगेबाबा विद्यापीठाने अधिसूचनेनुसार २९ आॅगस्ट २०१५ रोजी एकूण ४१० महाविद्यालयांत प्राध्यापकांना परीक्षा सुधार योजनेंतर्गत परीक्षा समन्वयक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबतचे पत्र परीक्षा नियंत्रक जयंत वडते यांनी प्राचार्यांना पाठविले होेते. मात्र ४१० पैकी केवळ २६६ महाविद्यालयात परीक्षा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यातही ८१ परीक्षा समन्वयकांचे कामकाज समाधानकारक असल्याचे प्राचार्यांनी पाठविलेल्या शिफारस पत्राद्वारे सिद्ध झाले आहे. महाविद्यालयांच्या कारभारावर विद्यापीठाने नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठाकडून जाणाऱ्या पत्राला प्राचार्यांनी प्रतिसाद देऊ नये, ही बाब लाजीरवाणी मानली जात आहे. महाविद्यालयात परीक्षा समन्वयकपदी एका प्राध्यापकांची नियुक्ती करण्याचे निर्देश विद्यापीठाने प्राचार्यांना दिले होेते. परीक्षा समन्वयकपदी नियुक्ती झालेल्या सदर प्राध्यापकाला कामकाजासाठी पाच हजार रुपयांचे मानधन दरवर्षी मिळणार होेते. परंतु ६० टक्के महाविद्यालयांमध्ये परीक्षा समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्राचार्यांनीच परीक्षा समन्वयक नियुक्तीचा फज्जा उडविला आहे. गतवर्षी नियुक्तीनंतर परीक्षा समन्वयकांच्या कार्याचा आढावा घेतला तर तो धक्कादायक आहे. १२५ महाविद्यालयांनी परीक्षा समन्वयकांचे मानधन देण्यासाठी विद्यापीठात प्रस्ताव पाठविला आहे. त्यापैकी ८१ प्राचार्यांनीच परीक्षा समन्वयकांचे काम समाधानकारक असल्याचे शिफारस पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी परीक्षा समन्वयकपदी प्राध्यापकांना तीन वर्षे नेमणूक देण्याची नियमावली होती. मात्र ४१० पैकी २६६ महाविद्यालयात परीक्षा समन्वकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर ८१ परीक्षा समन्वयक खऱ्या अर्थाने काम करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या हितासाठी की प्राचार्य, प्राध्यापकांच्या वेतनासाठी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)