शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्दळ मंदावली

By admin | Updated: May 11, 2014 22:49 IST

बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे.

अमरावती : बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे. शेतकर्‍यांजवळ साठवणुकीचा शेतमाल नाही. तसेच खरीप हंगाम महिन्याभर्‍यावर आला असल्याने शेती मशागतीची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे खरीप २०१४ च्या सोयाबीन, मूग व उडीदच्या उत्पादनापर्यंत साधारणपणे अशीच स्थिती राहणार आहे. मागील वर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून सोयाबीनची आवक सुरू झाली होती. डागाळलेल्या सोयाबिनची साठवणूक करण्यापेक्षा शेतकर्‍यांनी सोयाबीन विकणे पसंत केले. परिणामी जिल्ह्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यामधून सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये वाढली होती. मागील १० वर्षातील आवकचे सर्व रेकॉर्ड या वाढत्या आवकमुळे तुटले. दररोज ४० ते ५० हजाराची आवक या तुलनेत व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाची उचल कमी यामुळे शेतकर्‍यांना माल ठेवायला जागा राहत नव्हती. परिणामी बाजार समितीमध्ये आवक स्वीकारणे बंद करण्याची पाळी बाजार समितीवर आली. आवक वाढल्यामुळे बाजार समितीला वेळेत देखल बदल करावा लागला होता. वाढत्या आवकचे दुष्परिणाम झाले. व्यापार्‍यांनी षडयंत्र रचून भाव पाडला, शेतकर्‍यांना माल ठेवायला जागा नसल्याने पावसामुळे शेतमाल खराब झाला, वराई दरावरून व्यापारी, वाहतूकदार यांच्यात संघर्ष होऊन बाजार समिती बंद पडली. या सर्व प्रकारात बाजार समिती, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, वाहतूकदार यांची वर्दळ राहत असल्याने बाजार समिती फुलायची, परंतु सध्याच्या मोसमात शेतकर्‍यांची आवक कमी झाल्याने वर्दळ मंदावली आहे.