शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्दळ मंदावली

By admin | Updated: May 11, 2014 22:49 IST

बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे.

अमरावती : बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे. शेतकर्‍यांजवळ साठवणुकीचा शेतमाल नाही. तसेच खरीप हंगाम महिन्याभर्‍यावर आला असल्याने शेती मशागतीची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे खरीप २०१४ च्या सोयाबीन, मूग व उडीदच्या उत्पादनापर्यंत साधारणपणे अशीच स्थिती राहणार आहे. मागील वर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून सोयाबीनची आवक सुरू झाली होती. डागाळलेल्या सोयाबिनची साठवणूक करण्यापेक्षा शेतकर्‍यांनी सोयाबीन विकणे पसंत केले. परिणामी जिल्ह्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यामधून सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये वाढली होती. मागील १० वर्षातील आवकचे सर्व रेकॉर्ड या वाढत्या आवकमुळे तुटले. दररोज ४० ते ५० हजाराची आवक या तुलनेत व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाची उचल कमी यामुळे शेतकर्‍यांना माल ठेवायला जागा राहत नव्हती. परिणामी बाजार समितीमध्ये आवक स्वीकारणे बंद करण्याची पाळी बाजार समितीवर आली. आवक वाढल्यामुळे बाजार समितीला वेळेत देखल बदल करावा लागला होता. वाढत्या आवकचे दुष्परिणाम झाले. व्यापार्‍यांनी षडयंत्र रचून भाव पाडला, शेतकर्‍यांना माल ठेवायला जागा नसल्याने पावसामुळे शेतमाल खराब झाला, वराई दरावरून व्यापारी, वाहतूकदार यांच्यात संघर्ष होऊन बाजार समिती बंद पडली. या सर्व प्रकारात बाजार समिती, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, वाहतूकदार यांची वर्दळ राहत असल्याने बाजार समिती फुलायची, परंतु सध्याच्या मोसमात शेतकर्‍यांची आवक कमी झाल्याने वर्दळ मंदावली आहे.