शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आंबियाची संत्री मातीमोल

By admin | Updated: December 6, 2015 00:10 IST

संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्यावरही संत्रा फळाला लागलेली गळती,...

संत्रा उत्पादक हवालदिल : १० हजार ४१९ हेक्टरवर संत्राबागासुनील देशपांडे अचलपूर संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्यावरही संत्रा फळाला लागलेली गळती, तामिळनाडूत झालेला मुसळधार पाऊस, दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब यासह आदी राज्यांत विक्रीला आलेला राजस्थानचा संत्रा, व्यापाऱ्यांनी पाडलेले संत्र्याचे भाव आदी कारणांनी संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात १० हजार ४१९ हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक घेतले जाते. लहान संत्राफळे तर अक्षरश: रस्त्यावर फेकण्यात आलीत. संत्रा उत्पादकांचे यावर्षी प्रचंड नुकसान झाल्याने येथे संत्रा प्रक्रिया उद्योगाची गरज निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात वरूड व मोर्शी तालुक्याची ओळख असली तरी त्या पाठोपाठ अचलपूर तालुक्यातही संत्र्याचे पीक घेतले जाते. ५४,११६ पैकी १०,४१९ हेक्टर क्षेत्र संत्रा पिकाखाली आहे. तालुक्यातील १६,७२० हेक्टरचे सिंचन होत असून ८११३ विहिरीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून संत्राबागांना वेगवेगळ्या संकटांनी ग्रासले आहेत. भरीसभर तामिळनाडूत पावसाने हाहाकार केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. संत्र्याची मागणी घटली. दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाबसह इतर राज्यात विदर्भातील संत्र्याला मागणी होती. यंदा राजस्थानचा संत्रा दाखल झाल्याने अचलपूर तालुक्यातील संत्र्याचे भाव घसरले. तालुक्यात येणाऱ्या व्यापाऱ्यांनी संत्र्याला कवडीमोल भाव दिल्यामुळे संत्रा उत्पादक हतबल झाला. आज-उद्या भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांचा संत्रा गळू लागला. झाडावर होता त्यालाही आंबिया बहार येण्यासाठी उतरवावे लागले. पडलेला संत्रा विक्री होत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही, असे दिसत आहे.अचलपूर तालुक्याचे सिंचनक्षेत्र मोठे आहे. खारपाणपट्ट्यातही थोडीफार जमीन येते. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. पैकी ५४,११६ हेक्टर जमीन वाहितीखाली आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम, तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ४ हजार ९७६ एवढी असून खातेदार ९८,९१३ आहेत. सिंचनाच्या मुबलक सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात फळपिके घेतली जातात. पपई, केळी, पेरू, संत्रा, आंबा, आवळा, सीताफळ आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.यावर्षी अचलपूर तालुक्यावर निसर्गाची अवकृपा झाली. वर्षाच्या सुरुवातीलाच वादळी पावसाचा फटका पिकांना बसला. त्यात प्रामुख्याने केळी सापडली होती. जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी त्यानंतर दडी मारली. अत्यल्प झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेऱ्यात घट झाली. खारपाणपट्ट्यातील काही जमिनीत पेरणी झाली नाही. या वर्षात तालुक्यात २०४३ हेक्टरवर ज्वारी, १६०१२ हेक्टरवर सोयाबीन, १७११० हेक्टरवर कपाशी, ६१२६ हेक्टरमध्ये तूर पिकाची पेरणी करण्यात आली होती. तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. यावर्षी संत्र्याचे भरघोस पीक येऊनही मागणी नाही. ओलीताच्या सुविधा असल्याने वेगवेगळी पिके घेऊन जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. पण अस्मानी संकटापुढे शेतकरी हवालदिल होत आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगाशिवाय पर्याय नाही, असे दिसते.