शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

३६२ गावांतील पाणीटंचाईसाठी ४ कोटी

By admin | Updated: May 10, 2014 23:55 IST

जिल्ह्यामधील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यामधील एप्रिल ते जून २०१४ मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे.

अमरावती : जिल्ह्यामधील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यामधील एप्रिल ते जून २०१४ मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. या तिसर्‍या टप्प्यात जिल्ह्यामधील २३१ गावांमधील पाणी टंचाईची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान १८१ गावे या आराखड्यात आहे. जानेवारी ते जून २०१४ दरम्यान पाणी टंचाई निवारणार्थ ४ कोटी ४ लक्ष २९ हजारांचा निधी शासनाने उपलब्ध केला आहे. पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान ३६२ गावांमध्ये पाणी समस्या उद्भवू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा अनेक कामे प्रस्तावित केली आहे. यामध्ये ३८८ नळ योजनांची दुरूस्ती, १३४३ हातपंप, १९४ विजपंप, १४५९ सार्वजनिक व १६१८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ५८ लाख २५ हजार निधी खर्च करण्यात येत आहे. नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती ७३ कामे प्रस्तावित आहेत. यासाठी १ कोटी ५५ लाख ५० हजार रूपये मंजूर आहे. १३ तात्पुरत्या पूरक नळयोजना करण्यात येत आहे यासाठी ३९ लाखांचा निधी मंजूर आहे. २१७ नवीन विंधन विहीर तयार करण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ३६ लाख २० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. पाणी टंचाईसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा ४ कोटी ४ लाख २९ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.