शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

३६२ गावांतील पाणीटंचाईसाठी ४ कोटी

By admin | Updated: May 10, 2014 23:55 IST

जिल्ह्यामधील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यामधील एप्रिल ते जून २०१४ मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे.

अमरावती : जिल्ह्यामधील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यामधील एप्रिल ते जून २०१४ मध्ये पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. या तिसर्‍या टप्प्यात जिल्ह्यामधील २३१ गावांमधील पाणी टंचाईची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान १८१ गावे या आराखड्यात आहे. जानेवारी ते जून २०१४ दरम्यान पाणी टंचाई निवारणार्थ ४ कोटी ४ लक्ष २९ हजारांचा निधी शासनाने उपलब्ध केला आहे. पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात आॅक्टोबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान ३६२ गावांमध्ये पाणी समस्या उद्भवू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा अनेक कामे प्रस्तावित केली आहे. यामध्ये ३८८ नळ योजनांची दुरूस्ती, १३४३ हातपंप, १९४ विजपंप, १४५९ सार्वजनिक व १६१८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ५८ लाख २५ हजार निधी खर्च करण्यात येत आहे. नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती ७३ कामे प्रस्तावित आहेत. यासाठी १ कोटी ५५ लाख ५० हजार रूपये मंजूर आहे. १३ तात्पुरत्या पूरक नळयोजना करण्यात येत आहे यासाठी ३९ लाखांचा निधी मंजूर आहे. २१७ नवीन विंधन विहीर तयार करण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ३६ लाख २० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. पाणी टंचाईसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा ४ कोटी ४ लाख २९ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.