शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ४०० शाळांना लागणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील १३८ शाळांची पटसंख्या ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील १३८ शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी, तर २६२ शाळांची पटसंख्या ११ ते २० च्या दरम्यान आहे. अशा एकूण ४०० अशा शाळांवर संक्रांत येणार नाही ना, अशी भीती शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, कॉन्व्हेंटच्या वाढत्या संस्कृतीमुळे झेडपीच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या तुलनेत खासगी शाळा कितीतरी पुढे आहेत. कॉन्व्हेंटसोबतच या शाळांची पटसंख्या वाढत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे १०, तर २० पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यात जिल्ह्यातील १३८ शाळांत दहापेक्षा कमी, तर २६२ शाळांत २० पटसंख्या आहे. त्यामुळे अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्राच्या शाळांचे समायोजन केले जाणार नाही ना, असा प्रश्न शिक्षक व पालकांना भेडसावत आहे.

बॉक्स

अशी आहे आकडेवारी

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या १५८३

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा १३८

विसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा २६२

बॉक्स

तालुकानिहाय या शाळांचे होणार समायोजन

जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ३२,अमरावती ३३,महापालिका क्षेत्र १, अंजनगाव सुर्जी ३७, भातकुली ५१,चांदूर बाजार ३३,चांदूर रेल्वे १७,दर्यापूर ५०, धामणगाव रेल्वे १३,धारणी ८,मोर्शी २२,नांदगाव खंडेश्र्वर २८, तिवसा वरूड २६ अशा एकूण १० ते २० पटसंख्येच्या २१, ४०० शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे. त्यामुळे शासन धोरणानुसार या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळा समायोजन करण्याची प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित होते. तथापि तांत्रिक कारणामुळे या शाळा बंद करण्यात आल्या नाहीत किंवा त्या शाळांची इतर शाळांत समायोजन करण्यात आले नाही.

कोट

२० पेक्षा कमी पटसंख्या कमी असलेल्या शाळांचे शक्यतोवर नजीकच्या कमी अंतर असलेल्या मोठ्या शाळेत विद्यार्थाचे समायोजन करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. स्थानिक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्याच्या सोईच्या दृष्टीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप कुठल्याही कमी पटसंख्येच्या शाळेचे समायोजन केलेले नाही.

- ई. झेड. खान,

शिक्षणाधिकारी प्राथमिक

बॉक्स

पालकांना तूर्तास दिलासा

शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करावे लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत. परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

त्या शाळांवर दोन शिक्षक!

नियमानुसार पटसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या नसल्या तरी त्यांचे समायोजन होणार नाही. या शाळातील प्रत्येकी दोनच शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे.