शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेचे २.७५ कोटी बुडाल्यात जमा!

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

जिल्हा भूविकास बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमचे बेदखल करण्यात आले.

वसुलीसाठी कंत्राटी कर्मचारी : परतफेड योजनेची यशस्विता धोक्यातअमरावती : जिल्हा भूविकास बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमचे बेदखल करण्यात आले. त्यांना सेवामुक्तीच्या नोटीस दिल्याने बँकेला ‘येणे’ असलेली २.७५ कोटी रुपयांच्या थकीत कर्ज वसुलीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांना ‘बँकेवरील बोझा’ वाढू नये म्हणून सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्या गेले. तथापि थकीत कर्जवसुलीसाठी बँकेच्या अवसायक किंवा सहकार खात्याकडे निश्चित अशी योजना नाही. वसुलीसाठी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, असा पर्याय समोर आला आहे. तथापि या पर्यायाने थकीत कर्ज वसुली होईलच, याबाबत खुद्द सहकार विभागच साशंक आहे.सन २००७ पासून राज्यातील भूविकास बँकांना घरघर लागली. जिल्हा सहकारी बँका, खासगी वित्तीय संस्थांच्या स्पर्धेपुढे भूविकास बँकांनी शरणागती पत्करली व त्यापासून शेतकरी वर्गाचा या बँकेवरील विश्वासाला तडा गेला. त्याचा परिणाम कर्जवसुलीवर झाला. नवीन कर्जच देणे बंद झाल्याने शेतकऱ्यांनी बँकेकडे पाठ फिरविली. वसुली रखडली. थकीत कर्जासाठी विशेष प्रयत्नही करण्यात आली नाही आणि पर्यायाने बँकेवरील बोझा वाढतच गेला. परिणामी एप्रिल २०१५ मध्ये शिखर बँकेसह राज्यातील २९ भूविकास बँका बंद करण्याचा निर्णय झाला आणि मंगळवारी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रिक्त हस्ते बँकेच्या सेवेतून काढण्यात आले. त्यांच्यामध्येही असंतोष निर्माण झाला आहे. वसुलीवर नुकसान भरपाईअमरावती : बँक बुडाल्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे २.७५ कोटींची थकीत वसुली कशी होेईल? बँकेचे पूर्णवेळ कर्मचारी-अधिकारीच जी वसुली ७-८ वर्षांपासून करू शकले नाहीत ती वसुली आता ‘वातानुकूलित केबीन’मध्ये बसलेले अधिकारी कशी काय करू शकतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वसुलीसाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शेतकरी दारावर उभा करणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. ज्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बँकेच्या सेवेतून कायमचे मुक्त करण्यात आले, त्यांचे थकीत वेतन, ग्रॅज्युइटी आणि स्वेच्छानिवृत्तीची नुकसान भरपाई थकीत कर्ज वसुलीतून द्यावी, असे सहकार विभागाचे निर्देश आहेत. अमरावती भूविकास बँकेचा शेतकऱ्यांकडे सुमारे २ कोटी ७५ लाख रूपयांची थकीत कर्जवसुली आहे. तथापि या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सुमारे १५ कोटी रूपये एकत्रित नुकसान भरपाई द्यायची आहे. बँक अवसायनात गेल्यावर कर्जवसुली शक्य होणार नाही आणि बँकेची मालमत्ता विक्रीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे कर्जवसुली होणार नाही आणि बँकेची मालमत्ता विकली जाणार नाही, अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम केव्हा मिळेल, या विवंचनेत हे कर्मचारी अडकले आहेत.