शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

भूविकास बँकेचे २.७५ कोटी बुडाल्यात जमा!

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

जिल्हा भूविकास बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमचे बेदखल करण्यात आले.

वसुलीसाठी कंत्राटी कर्मचारी : परतफेड योजनेची यशस्विता धोक्यातअमरावती : जिल्हा भूविकास बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमचे बेदखल करण्यात आले. त्यांना सेवामुक्तीच्या नोटीस दिल्याने बँकेला ‘येणे’ असलेली २.७५ कोटी रुपयांच्या थकीत कर्ज वसुलीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांना ‘बँकेवरील बोझा’ वाढू नये म्हणून सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्या गेले. तथापि थकीत कर्जवसुलीसाठी बँकेच्या अवसायक किंवा सहकार खात्याकडे निश्चित अशी योजना नाही. वसुलीसाठी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, असा पर्याय समोर आला आहे. तथापि या पर्यायाने थकीत कर्ज वसुली होईलच, याबाबत खुद्द सहकार विभागच साशंक आहे.सन २००७ पासून राज्यातील भूविकास बँकांना घरघर लागली. जिल्हा सहकारी बँका, खासगी वित्तीय संस्थांच्या स्पर्धेपुढे भूविकास बँकांनी शरणागती पत्करली व त्यापासून शेतकरी वर्गाचा या बँकेवरील विश्वासाला तडा गेला. त्याचा परिणाम कर्जवसुलीवर झाला. नवीन कर्जच देणे बंद झाल्याने शेतकऱ्यांनी बँकेकडे पाठ फिरविली. वसुली रखडली. थकीत कर्जासाठी विशेष प्रयत्नही करण्यात आली नाही आणि पर्यायाने बँकेवरील बोझा वाढतच गेला. परिणामी एप्रिल २०१५ मध्ये शिखर बँकेसह राज्यातील २९ भूविकास बँका बंद करण्याचा निर्णय झाला आणि मंगळवारी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रिक्त हस्ते बँकेच्या सेवेतून काढण्यात आले. त्यांच्यामध्येही असंतोष निर्माण झाला आहे. वसुलीवर नुकसान भरपाईअमरावती : बँक बुडाल्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे २.७५ कोटींची थकीत वसुली कशी होेईल? बँकेचे पूर्णवेळ कर्मचारी-अधिकारीच जी वसुली ७-८ वर्षांपासून करू शकले नाहीत ती वसुली आता ‘वातानुकूलित केबीन’मध्ये बसलेले अधिकारी कशी काय करू शकतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वसुलीसाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शेतकरी दारावर उभा करणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. ज्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बँकेच्या सेवेतून कायमचे मुक्त करण्यात आले, त्यांचे थकीत वेतन, ग्रॅज्युइटी आणि स्वेच्छानिवृत्तीची नुकसान भरपाई थकीत कर्ज वसुलीतून द्यावी, असे सहकार विभागाचे निर्देश आहेत. अमरावती भूविकास बँकेचा शेतकऱ्यांकडे सुमारे २ कोटी ७५ लाख रूपयांची थकीत कर्जवसुली आहे. तथापि या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सुमारे १५ कोटी रूपये एकत्रित नुकसान भरपाई द्यायची आहे. बँक अवसायनात गेल्यावर कर्जवसुली शक्य होणार नाही आणि बँकेची मालमत्ता विक्रीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे कर्जवसुली होणार नाही आणि बँकेची मालमत्ता विकली जाणार नाही, अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम केव्हा मिळेल, या विवंचनेत हे कर्मचारी अडकले आहेत.