शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वरुड तालुक्यात १५ वर्षांत २२२ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: September 7, 2015 00:28 IST

विदर्भाच्या नकाशावर वरुड तालुक्याची ओळख सधन तालुका म्हणून असली तरी अलीकडच्या काळात नापिकी व निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे

नापिकी, कर्जबाजारी : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे  वरुडविदर्भाच्या नकाशावर वरुड तालुक्याची ओळख सधन तालुका म्हणून असली तरी अलीकडच्या काळात नापिकी व निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. बँका, सावकारांच्या कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. १५ वर्षांत २२२ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात नर्सरी उत्पादकांची संख्या अधिक आहे. सततच्या दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील हातुर्णा, सावंगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सावंगा, सुरळी, सावंगी या गावांचा समावेश आहे. या गावांमधून वरुड, लोणी, शेंदूरजनाघाट येथील शेतकऱ्यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी २००१ ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत तब्बल २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला असून दुबार , तिबार पेरणी करुनही शेतीने साथ दिली नाही तर उत्पादनात कमालीची घट झाली. परंतु हमी भाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळ ग्रस्त परिस्थितीत तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा गळाला. यामुळ मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली. केवळ शेतीवर असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. मुला-मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुबांचे पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला तर बँकांचे कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे द्यायचे की गहाणातील जमिनी सावकारालाच द्यायच्या, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शासनादेश असतानाही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकरी व्दिधा मन:स्थितीत आहेत.कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय ? तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँका वसुलीचा तगादा आणि पोलिसी खाक्या दाखविला जात आहे. स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापुढे बँका पोलीस आणि कर्जवसुली पथक मानहाणी करतात. न्यायालयीन प्रकरणे दाखल करुन शेतकऱ्यांना कोर्टात खेचले जात असल्याने शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग निवडावा लागत आहे. फायनान्स कंपन्यांची दंडुकेशाही कारणीभूत शेतकऱ्यांना बँकेने कर्ज नाकारले किंवा कृषी कर्ज घेतल्यांनतर मुलांच्या शिक्षणाकरिता काही अडचणी आल्यास घरबांधणीच्या नावावर फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले जाते. कर्ज परत करताना विलंब झाल्यास फायनान्स कंपन्या विशेष वसुली पथक नेमून दंडूकेशाहीच्या मार्गाने रात्री बेरात्री कर्जदार शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकरी आत्महत्या झाल्यात. यामध्ये खानापूरच्या शिवहरी ढोक यांना अशाच प्रकारे त्रास दिला जात होता. यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती आहे.