शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

वरुड तालुक्यात १५ वर्षांत २२२ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: September 7, 2015 00:28 IST

विदर्भाच्या नकाशावर वरुड तालुक्याची ओळख सधन तालुका म्हणून असली तरी अलीकडच्या काळात नापिकी व निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे

नापिकी, कर्जबाजारी : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे  वरुडविदर्भाच्या नकाशावर वरुड तालुक्याची ओळख सधन तालुका म्हणून असली तरी अलीकडच्या काळात नापिकी व निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. बँका, सावकारांच्या कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. १५ वर्षांत २२२ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात नर्सरी उत्पादकांची संख्या अधिक आहे. सततच्या दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील हातुर्णा, सावंगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सावंगा, सुरळी, सावंगी या गावांचा समावेश आहे. या गावांमधून वरुड, लोणी, शेंदूरजनाघाट येथील शेतकऱ्यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी २००१ ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत तब्बल २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला असून दुबार , तिबार पेरणी करुनही शेतीने साथ दिली नाही तर उत्पादनात कमालीची घट झाली. परंतु हमी भाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळ ग्रस्त परिस्थितीत तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा गळाला. यामुळ मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली. केवळ शेतीवर असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. मुला-मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुबांचे पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला तर बँकांचे कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे द्यायचे की गहाणातील जमिनी सावकारालाच द्यायच्या, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शासनादेश असतानाही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकरी व्दिधा मन:स्थितीत आहेत.कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय ? तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँका वसुलीचा तगादा आणि पोलिसी खाक्या दाखविला जात आहे. स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापुढे बँका पोलीस आणि कर्जवसुली पथक मानहाणी करतात. न्यायालयीन प्रकरणे दाखल करुन शेतकऱ्यांना कोर्टात खेचले जात असल्याने शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग निवडावा लागत आहे. फायनान्स कंपन्यांची दंडुकेशाही कारणीभूत शेतकऱ्यांना बँकेने कर्ज नाकारले किंवा कृषी कर्ज घेतल्यांनतर मुलांच्या शिक्षणाकरिता काही अडचणी आल्यास घरबांधणीच्या नावावर फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले जाते. कर्ज परत करताना विलंब झाल्यास फायनान्स कंपन्या विशेष वसुली पथक नेमून दंडूकेशाहीच्या मार्गाने रात्री बेरात्री कर्जदार शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकरी आत्महत्या झाल्यात. यामध्ये खानापूरच्या शिवहरी ढोक यांना अशाच प्रकारे त्रास दिला जात होता. यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती आहे.