शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

१४ हजार पालकांनी पुस्तके केली परत, आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:12 IST

अमरावती : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत ...

अमरावती : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्याने जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तके जतनाची गोडी लागावी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यात १४ हजार पालकांनी ८२ पुस्तके परत केली आहेत.

२०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या ३ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाहीत. तर, पाचवी ते आठवीच्या शाळा काही काळ उघडल्या व प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या फारसा वापर झाला नसल्याने ती सुस्थितीत आहेत. शिक्षणाधिकारी ए.झेड. खान, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी पुढाकार घेऊन पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी विनंती केली. त्याला पालकांनी प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षासाठी ३ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांकरिता पुस्तकांच्या संचाची मागणी असेल. त्यात पुनर्वापरासाठी आलेल्या पुस्तकांमुळे कमी संच मागवावे लागतील. त्यामुळे शासनाचा पैसा तर वाचेलच. परंतु विद्यार्थ्यांना पुस्तके चांगल्याप्रकारे हाताळण्याची सवयही लागणार आहे.

-----------------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली- ४०६३५

दुसरी- ४३७४५

तिसरी- ४५१०१

चौथी- ४३८७४

पाचवी-४४७२१

सहावी-४४०५४

सातवी- ४४४२०

आठवी- ४५५१६

००००००००००००

अशी आहे आकडेवारी

मागील वर्षी संच वाटप------------------- ३ लाख ५२ हजार

यावर्षी मागणी ----------------------- ३ लाख ३७ हजार

०००००००००००००

१४ हजार ८२ पालकांचा पुढाकार

- पुस्तके परत केलेल्या १४ हजार ८२ पालकांकडून ईतरही पालकांनी पुस्तके परत करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

- मराठी माध्यमांची ६००९, उर्दू माध्यमांची ४०२३ संच परत आले आहेत. ४०५० सेमी ईंग्रजीचेही येथून संच परत येणार असल्याचे शाळांनी शिक्षण विभागाला कळविले आहे.

- ८०६७ तिवसा, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातून सर्वाधिक पुस्तक संच परत मिळाले आहेत. धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यातील शाळांतून सर्वात कमी संच परत मिळणार आहेत.

०००००००००००००००००

पालक म्हणतात.............

पुस्तके मोफत मिळत असली तरी विद्यार्थ्यांंना आपल्या पाल्याला निटनिटकेपणा मू्ल्याची जाणीव व्हावी, यासाठी पुस्तकांची निगा ठेवण्याचे भान त्यांना दिले पाहिजे. यातून अनेक फायदे आहेत. तसेच समाधानही आहे.

- वैशाली काळे, पालक,

----------------------------

कागद वाचला तर पर्यावरणाची हानी कमी होईल. हे भान पुस्तक पुनर्वापराच्या योजनेतून पाल्यांना मिळते आहे. पुस्तकांना योग्य कव्हर लावून वर्षभर विद्यार्थी पुस्तकांना जपतात. शिक्षकही त्याकडे लक्ष देतात. सर्व पालकांनी पुस्तके परत द्यायला हवी.

- ईमरानखॉ पठाण, पालक

------------------

समग्र शिक्षा अभियानातून दिलेले पुस्तक संच पुनर्वापरासाठी देण्याकरिता त्याची वर्षभर निगा राखावी लागते. आपणही पुस्तक परत देण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावू या भावनेतून पुस्तकांची निगा, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना कळेल. पालकही त्याकडे लक्ष देतील. त्यासंदर्भात शाळा स्तरावर शिक्षकही जनजागृती करीत आहे.

- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती