शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

१४ हजार पालकांनी पुस्तके केली परत, आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:12 IST

अमरावती : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत ...

अमरावती : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्याने जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तके जतनाची गोडी लागावी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यात १४ हजार पालकांनी ८२ पुस्तके परत केली आहेत.

२०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या ३ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाहीत. तर, पाचवी ते आठवीच्या शाळा काही काळ उघडल्या व प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या फारसा वापर झाला नसल्याने ती सुस्थितीत आहेत. शिक्षणाधिकारी ए.झेड. खान, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी पुढाकार घेऊन पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी विनंती केली. त्याला पालकांनी प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षासाठी ३ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांकरिता पुस्तकांच्या संचाची मागणी असेल. त्यात पुनर्वापरासाठी आलेल्या पुस्तकांमुळे कमी संच मागवावे लागतील. त्यामुळे शासनाचा पैसा तर वाचेलच. परंतु विद्यार्थ्यांना पुस्तके चांगल्याप्रकारे हाताळण्याची सवयही लागणार आहे.

-----------------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पहिली- ४०६३५

दुसरी- ४३७४५

तिसरी- ४५१०१

चौथी- ४३८७४

पाचवी-४४७२१

सहावी-४४०५४

सातवी- ४४४२०

आठवी- ४५५१६

००००००००००००

अशी आहे आकडेवारी

मागील वर्षी संच वाटप------------------- ३ लाख ५२ हजार

यावर्षी मागणी ----------------------- ३ लाख ३७ हजार

०००००००००००००

१४ हजार ८२ पालकांचा पुढाकार

- पुस्तके परत केलेल्या १४ हजार ८२ पालकांकडून ईतरही पालकांनी पुस्तके परत करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

- मराठी माध्यमांची ६००९, उर्दू माध्यमांची ४०२३ संच परत आले आहेत. ४०५० सेमी ईंग्रजीचेही येथून संच परत येणार असल्याचे शाळांनी शिक्षण विभागाला कळविले आहे.

- ८०६७ तिवसा, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातून सर्वाधिक पुस्तक संच परत मिळाले आहेत. धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यातील शाळांतून सर्वात कमी संच परत मिळणार आहेत.

०००००००००००००००००

पालक म्हणतात.............

पुस्तके मोफत मिळत असली तरी विद्यार्थ्यांंना आपल्या पाल्याला निटनिटकेपणा मू्ल्याची जाणीव व्हावी, यासाठी पुस्तकांची निगा ठेवण्याचे भान त्यांना दिले पाहिजे. यातून अनेक फायदे आहेत. तसेच समाधानही आहे.

- वैशाली काळे, पालक,

----------------------------

कागद वाचला तर पर्यावरणाची हानी कमी होईल. हे भान पुस्तक पुनर्वापराच्या योजनेतून पाल्यांना मिळते आहे. पुस्तकांना योग्य कव्हर लावून वर्षभर विद्यार्थी पुस्तकांना जपतात. शिक्षकही त्याकडे लक्ष देतात. सर्व पालकांनी पुस्तके परत द्यायला हवी.

- ईमरानखॉ पठाण, पालक

------------------

समग्र शिक्षा अभियानातून दिलेले पुस्तक संच पुनर्वापरासाठी देण्याकरिता त्याची वर्षभर निगा राखावी लागते. आपणही पुस्तक परत देण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावू या भावनेतून पुस्तकांची निगा, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना कळेल. पालकही त्याकडे लक्ष देतील. त्यासंदर्भात शाळा स्तरावर शिक्षकही जनजागृती करीत आहे.

- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती