शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

कृषी विकासासाठी १००० कोटी

By admin | Updated: January 12, 2017 00:05 IST

खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

अमरावती : खारपाणपट्ट्यातील गावे लागवडीयोग्य करण्यासाठी व हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करण्यासाठी जिल्ह्यात १००० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या प्रयत्नातून कृषी संजीवनी योजनेंतर्गत हा निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची बैठक मुंबई येथील सह्याद्री वसतिगृहात बुधवारी पार पडली. यावेळी अमरावती जिल्ह्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रकल्पांतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा तसेच मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगावचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. ४ हजार कोटींचा प्रकल्पअमरावती : प्रकल्पाकरिता जागतिक बँकेकडून २८०० कोटी मिळणार असून राज्य शासनाच्या १२०० कोटींच्या वाट्यासह एकूण ४००० कोटींचा निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. खारपाण पट्ट्यांतर्गत सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या अमरावती जिल्ह्यास १००० कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. याबैठकीला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांचे प्रयत्न, खारपाणपट्ट्यासाठी उपलब्धी पाण्याच्या ताळेबंदाने होणार पिकांचे नियोजन याप्रकल्पांतर्गत समूहपद्धतीने गावांची निवड करून शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीकनियोजन करण्यात येणार आहे. तसेच कृषी अवजारे विविध सुविधा केंद्राद्वारे लहान शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर पुरविण्यात येणार आहे व खारपाण पट्ट्यातील जमीन व्यवस्थेसाठी सर्व बाधित गावांचा समावेश करुन विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.हवामान बदलास अनुसरून साधणार कृषीविकास हवामान बदलास अनुसरुन कृषीपद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांचे कृषी उत्पादकतेमध्ये वृद्धी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे हा नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.