शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

टिचभर पोटासाठी.. आयुष्याची बाजी!

By admin | Updated: September 16, 2014 18:19 IST

दारिद्रय़ाच्या खाईत मुलांचे भविष्य गडप

अकोला : उपाशी पोटी आतड्यांना पिळ पडल्यानंतर जेव्हा डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात, तेव्हा कळतं भूक काय असते? तसे तर बालपण खेळण्या-बागडण्याचे वय. या वयात मनसोक्त खेळणे, संकट, समस्यांपासून मुक्त राहून भविष्याची पायाभरणी करणे, हेच अपेक्षित असते. मात्र, शहरातील अनिकट, वाशिम बायपास परिसरातील मुलांच्या नशिबी भलतेच दारिद्रय़ आले आहे. या गरिबीने त्यांच्यापासून त्यांचे सुखच हिरावले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी या मुलांना तासन्तास मेहनत घेऊन वेळप्रसंगी जीव धोक्यात घालावा लागत आहे. एवढे सर्व करूनही त्यांना दिवसाला मिळते काय ते पाच ते दहा रुपये. नुकताच हर्षोल्हासात गणेश उत्सव साजरा झाला. अकोल्यातही लाखो लोकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करीत नुकतेच गणेश मूतर्ी्ंचे शहरातून वाहणार्‍या मोर्णा नदीत विसर्जन केले. गणेश मूर्तीसोबतच दहा दिवसांचे हार फुलांचे निर्माल्यही विसजिर्त करण्यात आले. या निर्माल्यासोबतच गणेश मूर्तीसमोरील, कलशामध्ये ठेवलेले पैसेही नदीत फेकण्यात येतात आणि मग विसर्जनाच्या दुसर्‍या दिवसापासून सुरू होतो तो या पैशांचा शोध. शहरातील अनिकट, हरिहरपेठ व वाशिम बायपास या नदीकाठच्या भागात दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती आहे. कमालीचे दारिद्रय़ या लोकांच्या नशिबी आले आहे. शिक्षणाचे तर नामोनिशाणही नाही. मोलमजुरी करणे, कुटुंबाचे पालनपोषण करणे, हीच दिनचर्या. त्यातही व्यसनांचा भडीमार. या भागातील पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुले-मुली दरवर्षी गणेश विसर्जनानंतर तीन ते चार दिवस नदीमध्ये पैशांचा शोध घेत असतात. शाळा अन् शिक्षण तर माहितीच नाही. ही मुले टेपरेकॉर्डरचा स्पीकरला लोहचुंबक लावतात. या लोहचुंबकाला दोरी बांधायची व ज्या ठिकाणी मूर्ती शिरविण्यात आल्या तेथे उभे राहून लोहचुंबक पाण्यात फेकायचे, ते फिरवायचे व बाहेर काढायचे. त्याला काही पैसे चिटकले का हे पाहायचे. पुन्हा फेकायचे. अशाप्रकारे दिवसभर पाण्यात उभे राहून, थोड्या थोड्या वेळाने जागा बदलून ही मुले पाण्यात पैशांचा शोध घेत असतात. आणि त्यांना मिळतात केवळ पाच ते दहा रुपये. तेही सापडण्याची शक्यता धुसरच. मात्र, तरीही गरिबी, पोटात ओरडणारे कावळेच त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतात आणि जीव धोक्यात घालून ते पैशांचा शोध घेत असतात.