शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

टिचभर पोटासाठी.. आयुष्याची बाजी!

By admin | Updated: September 16, 2014 18:19 IST

दारिद्रय़ाच्या खाईत मुलांचे भविष्य गडप

अकोला : उपाशी पोटी आतड्यांना पिळ पडल्यानंतर जेव्हा डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात, तेव्हा कळतं भूक काय असते? तसे तर बालपण खेळण्या-बागडण्याचे वय. या वयात मनसोक्त खेळणे, संकट, समस्यांपासून मुक्त राहून भविष्याची पायाभरणी करणे, हेच अपेक्षित असते. मात्र, शहरातील अनिकट, वाशिम बायपास परिसरातील मुलांच्या नशिबी भलतेच दारिद्रय़ आले आहे. या गरिबीने त्यांच्यापासून त्यांचे सुखच हिरावले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी या मुलांना तासन्तास मेहनत घेऊन वेळप्रसंगी जीव धोक्यात घालावा लागत आहे. एवढे सर्व करूनही त्यांना दिवसाला मिळते काय ते पाच ते दहा रुपये. नुकताच हर्षोल्हासात गणेश उत्सव साजरा झाला. अकोल्यातही लाखो लोकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करीत नुकतेच गणेश मूतर्ी्ंचे शहरातून वाहणार्‍या मोर्णा नदीत विसर्जन केले. गणेश मूर्तीसोबतच दहा दिवसांचे हार फुलांचे निर्माल्यही विसजिर्त करण्यात आले. या निर्माल्यासोबतच गणेश मूर्तीसमोरील, कलशामध्ये ठेवलेले पैसेही नदीत फेकण्यात येतात आणि मग विसर्जनाच्या दुसर्‍या दिवसापासून सुरू होतो तो या पैशांचा शोध. शहरातील अनिकट, हरिहरपेठ व वाशिम बायपास या नदीकाठच्या भागात दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती आहे. कमालीचे दारिद्रय़ या लोकांच्या नशिबी आले आहे. शिक्षणाचे तर नामोनिशाणही नाही. मोलमजुरी करणे, कुटुंबाचे पालनपोषण करणे, हीच दिनचर्या. त्यातही व्यसनांचा भडीमार. या भागातील पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुले-मुली दरवर्षी गणेश विसर्जनानंतर तीन ते चार दिवस नदीमध्ये पैशांचा शोध घेत असतात. शाळा अन् शिक्षण तर माहितीच नाही. ही मुले टेपरेकॉर्डरचा स्पीकरला लोहचुंबक लावतात. या लोहचुंबकाला दोरी बांधायची व ज्या ठिकाणी मूर्ती शिरविण्यात आल्या तेथे उभे राहून लोहचुंबक पाण्यात फेकायचे, ते फिरवायचे व बाहेर काढायचे. त्याला काही पैसे चिटकले का हे पाहायचे. पुन्हा फेकायचे. अशाप्रकारे दिवसभर पाण्यात उभे राहून, थोड्या थोड्या वेळाने जागा बदलून ही मुले पाण्यात पैशांचा शोध घेत असतात. आणि त्यांना मिळतात केवळ पाच ते दहा रुपये. तेही सापडण्याची शक्यता धुसरच. मात्र, तरीही गरिबी, पोटात ओरडणारे कावळेच त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतात आणि जीव धोक्यात घालून ते पैशांचा शोध घेत असतात.