शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे अधिवेशन आता अशैक्षणिक कालावधीतच!

By admin | Updated: September 20, 2014 20:08 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाचा निर्णय.

वाशिम: राज्यातील विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संघटनांची अधिवेशने यापुढे अशैक्षणिक कालावधीत, म्हणजेच दीर्घकालीन सुट्यांमध्येच घेण्याचा आदेश, राज्य शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने काढला आहे.शैक्षणिक कालावधीत अधिवेशन घेतल्यास, अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांकडून रजा घेतल्या जातात आणि परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अशा अधिवेशनांच्या काळात अनेक शाळा बंद राहत असल्याने, विधिमंडळात शासनावर प्रखर टीका झाली होती. त्यावेळी या प्रकाराला आवर घालण्यासाठी निश्‍चित धोरण आखण्याचे आश्‍वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्या होते. या पार्श्‍वभूमीवर, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना काही अटींवरच अधिवेशनांना हजर राहण्यासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात १५ सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, अधिवेशनाचे आयोजन करणारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संघटना मान्यताप्रा प्त असावी, अधिवेशन दीर्घकालीन सुट्यांमध्येच घेण्यात यावे, अधिवेशनासाठी शासनाची पूर्व परवानगी घेतलेली असावी, अधिवेशनामध्ये अशैक्षणिक कामांचा समावेश नसावा, शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रबोधनात्मक कामांचाच अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत समावेश असावा आणि राज्यस् तरीय अधिवेशन तीन दिवस, तर जिल्हास्तरीय अधिवेशन दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे असू नये. यापूढे अधिवेशन कालावधीमध्ये शासनाकडून कोणत्याही प्रकारचा वित्तीय लाभ व सवलती मिळणार नाहीत, तसेच जिल्हास्तरीय अधिवेशनाकरिता प्रवासाचा कालावधी अनुट्ठोय राहणार नसून, उपस्थितीच्या प्रमाणपत्राशिवाय शिक्षकांची अधिवेशनांमधील उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. *** राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संघटनांतर्फे, त्यांच्या विविध मागण्या व इतर प्रश्नांकरिता दोन ते तीन दिवस कालावधीची अधिवेशने आयोजित केली जातात. आपल्या सदस्यांना अधिवेशन काळ, तसेच अधिवेशनस्थळी जाण्यायेण्याकरिता नैमित्तीक रजा देण्यात यावी, अशी मागणी या संघटनांकडून केली जाते. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून ही मागणी मान्य केली जात नाही; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय विभागाकडून सदर मागणी मान्य करण्यात येत असल्याने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनांना मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावतात आणि परिणामी अधिवेशनांच्या कालावधीत शाळा बंद राहण्याचे प्रकार सातत्याने घडत होते.