शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबता थांबेना!

By admin | Updated: May 11, 2014 22:03 IST

जिल्हाधिकार्‍यांचे निर्देशही पायदळी

वाशिम : संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी नगर परिषद प्रशासनाला सर्व दुकानदारांच्याकडून ४0 मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करावा, असे निर्देश आठ दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, प्लास्टिक पिशव्यांच्या साठय़ांचा शोध घेण्याचा मुहुर्त जिल्ह्यातील नगर परिषद प्रशासनाला अजूनही सापडला नसल्याचे दिसून येते. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची एक खास बैठक बोलाविली होती. या बैठकीत नगर परिषद प्रशासनाला विशेष सूचनाही दिल्या होत्या. जिल्हय़ातील सर्व नगर परिषदांनी आपल्या हद्दीतील धोकादायक इमारती व अतिक्रमीत इमारतीचा सर्व्हे करुन संबंधित मालकांना नोटीस देवून कारवाई करावी, इमारती धोकादायक ठरविण्याआधी त्यांची योग्य प्रकारे तपासणी करावी, शहरातील नाले, ओढे साफ करुन त्यांच्यावरील अतिक्रमणे दुर करावीत, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबून दुर्घटना होण्याची शक्यता असते त्यामुळे नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व दुकानदारांच्याकडून ४0 मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करावा, तसेच त्याचा वापर करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश कुलकर्णी यांनी दिले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा एक भाग म्हणून नगर परिषद प्रशासनाने तातडीने नियोजन करणे अपेक्षीत होते. मात्र, नाले सफाई, प्लास्टिक पिशव्यांचे साठे, धोकादायक इमारतीबाबत जिल्ह्यातील चारही नगर परिषदेचे प्रशासन अजूनही फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा अत्यंत कडक असल्याची जाणीवही करून दिलेली आहे. या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा व आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागानी याची पूर्तता करावी. आपत्ती ही केवळ नैसर्गिक नसते तर ती मानव निर्मितही असते त्यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट बजावले. कार्बाईड व तत्सम रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या फळांची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. मात्र, वाशिम शहरात रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या फळांची सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या-त्या यंत्रणेवर आहे. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाही.