शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची ...

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची संकल्पना मुलांना शिकविली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांनी शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समग्र शिक्षा योजनेतर्गंत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या पाठ्यपुस्तकांवर होतो. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून व सुव्यवस्थित ठेवतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापकांनी पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करावे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होईल आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. गतवर्षीपासून शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी २०१९-२० आणि २०२०-२०२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर करण्यात येणार आहे.

एकूण शाळा- १,४८८

एकूण विद्यार्थी- १,५७,१९८

गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके

इ. १ ली- १५,४४३

इ. २ री- १६,२५३

इ. ३ री- १७,४८७

इ. ४ थी- १९,०८३

इ. ५ वी- २१,४३०

इ. ६ वी- २१,७४७

इ. ७ वी- २२,०५१

इ. ८ वी- २२,७०४

पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी वापरलेली पुस्तके मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आणून द्यावी व पर्यावरण संवर्धनात सहभाग द्यावा.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

पुस्तकांच्या पुनर्वापराबद्दल जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची आढावा सभा घेण्यात आली. त्यात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर प्रकल्पास हातभार लावावा. पालकांनीसुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पाल्याने वापरलेली पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी पडतील. यासाठी सहकार्य करावे.

- नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान