शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यंदा शालेय पाठ्यपुस्तकांचा होणार पुनर्वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची ...

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट केला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्वापराची संकल्पना मुलांना शिकविली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांनी शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समग्र शिक्षा योजनेतर्गंत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च या पाठ्यपुस्तकांवर होतो. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून व सुव्यवस्थित ठेवतात. अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापकांनी पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करावे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदाची बचत होईल आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. गतवर्षीपासून शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात त्या शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी २०१९-२० आणि २०२०-२०२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी. पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर करण्यात येणार आहे.

एकूण शाळा- १,४८८

एकूण विद्यार्थी- १,५७,१९८

गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके

इ. १ ली- १५,४४३

इ. २ री- १६,२५३

इ. ३ री- १७,४८७

इ. ४ थी- १९,०८३

इ. ५ वी- २१,४३०

इ. ६ वी- २१,७४७

इ. ७ वी- २२,०५१

इ. ८ वी- २२,७०४

पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी वापरलेली पुस्तके मुख्याध्यापक, शिक्षकांकडे आणून द्यावी व पर्यावरण संवर्धनात सहभाग द्यावा.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

पुस्तकांच्या पुनर्वापराबद्दल जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची आढावा सभा घेण्यात आली. त्यात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर प्रकल्पास हातभार लावावा. पालकांनीसुद्धा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पाल्याने वापरलेली पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी पडतील. यासाठी सहकार्य करावे.

- नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान