शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

खरिपात पेरणीसाठी घरचे बियाणे राखून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन: तालुक्यात २७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन संतोषकुमार गवई पातूर: येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या ...

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन: तालुक्यात २७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन

संतोषकुमार गवई

पातूर: येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन पातूर तालुका कृषी अधिकारी डी.एस. शेटे यांनी केले आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी तालुक्यात जवळपास ४२,५०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून, यापैकी २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी बियाणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाणांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व प्रमाणित बियाणांपासून उत्पादित झालेले सोयाबीन यावर्षी पेरणीसाठी वापरू शकतात. प्रमाणित बियाणाच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रकारच्या सोयाबीनचे बियाणे म्हणून निवड करावी. मात्र, हे करत असताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------------------------

सोयाबीन बियाणे साठवणुकीची योग्य पद्धत

स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नवीन व गोनपाट पोत्यात साठवावे; मात्र यासाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा. पोत्याची थप्पी ठेवताना थंड किंवा ओलावा विरहित, हवा असलेल्या जागेत ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहेत. त्यामुळे सोयाबीन बियाणाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्याघरी बियाणाची आधी उगवणक्षमता तपासावी.

---------------------------------------------

तालुक्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटणार!

गतवर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उडीद, मुगाची पेरणी केली होती. पीक चांगले बहरले होते; मात्र ऐन फुलधारणेच्या अवस्थेत अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे यंदा तालुक्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागामार्फत वर्तविण्यात आली आहे.