शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

खारपाणपट्टय़ात वाढला तूर, मुगाचा पेरा

By admin | Updated: July 1, 2016 02:03 IST

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनपाठोपाठ कापसाचा पेरा वाढला आहे.

दीपक अग्रवाल /मूर्तिजापूर (जि. अकोला)यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर, मूग, उडीद पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळला आहे. खोडमाशी व एलोमोझ्ॉकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना शुद्ध नफा मोठय़ा प्रमाणात गमवावा लागला. यावर्षी पीक पद्धतीत बदल होऊन खारपाणपट्टय़ात तूर, मूग या पिकांचा २५ टक्के पेरा वाढल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.तालुक्याचे ७४ हजार ६00 हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. १२ हजार २१0 हेक्टर क्षेत्र केवळ सिंचनाखाली असून ६५२ हजार ३९0 हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. गेल्या वर्षात खरीप हंगामात कृषी विभागाने एकूण ६९ हजार ८६0 हेक्टर क्षेत्रात ६५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात पेरणीचा लक्ष्यांक निर्धारित केला होता. त्यांपैकी ६८ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली होती; मात्र अत्यल्प पाऊस, पेरणीस विलंब या कारणामुळे पीक उत्पादनात घट झाली. सोयाबीन हेक्टरी ६.५0 क्विंटल, मूग २.५0 क्विंटल, उडीद २.६५ क्विंटल, हरभरा ५ ते १0 क्विंटल असे उत्पादन झाले होते. यामध्ये शेकर्‍यांचा लागवड खर्चही निघाला नव्हता. यावर्षी कृषी विभागाने पीक पेरणीसाठी एकूण ६९ हजार ७६0 हेक्टर सरासरी क्षेत्राकरिता ६९ हजार ४७0 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. सोयाबीन पिकासाठी १७ हजार ५९0 सरासरी क्षेत्रात ३५ हजार हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीनपाठोपाठ कपाशी २६ हजार ७४0 हेक्टर येत्रात १६000 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. तुरीसाठी ८ हजार २७0, मूग ८ हजार २७0 हेक्टर क्षेत्रात अनुक्रमे १0 हजार व ३५00 लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीन व कापसाचा पेरा सर्वाधिक असला तरी तूर, मूग व उडीद पीक घेण्यासाठी २५ टक्के शेतकरी वळल्याचे चित्र आहे. सोयाबीन हे नगदी पीक आहे. याच तुलनेत मूग, तूर, उडीद, पिकांचा चांगला बाजारभाव असल्यामुळे शेतकर्‍यांनी यावेळी तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांकडे मोर्चा वळविला आहे.