शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

व्यापार्‍यांनी पाडले कांद्याचे भाव

By admin | Updated: May 11, 2014 23:10 IST

शेतकरी हवालदिल

तेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती क्षेत्रात मोडतो. तालुक्यातील अडगाव, बेलखेड, तळेगाव, माळेगाव, दानापूर परिसरात कांद्याचा भरपूर पेरा आहे; परंतु व्यापार्‍यांनी कांद्याचे भाव अचानक पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाळा जास्त झाल्याने शेतकर्‍यांचे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी हे खरीप पीक हातचे गेले. त्यानंतर शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू व कांदा पिकांची लागवड केली. कांदा पिकाला प्रतिएकर जवळपास २० ते २५ हजार रुपयांचा खर्च आला. त्यात फेब्रुवारी महिन्यात गारपिटीचा तडाखा बसल्याने काही भागांमधील कांदा सडला. काही भागांमध्ये कांद्याचे उत्पादन चांगले होत आहे. व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांकडून सुरुवातीला ७०० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची खरेदी केली. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गत काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला. व्यापार्‍यांनी या संधीचा फायदा घेत कांद्याचे भाव अचानक पाडले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडद्वारे कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी गोपाल अग्रवाल, मनोज राऊ, प्रवीण खारोडे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.