शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

समस्यांच्या फेर्‍यात मंगरुळपीर बसस्थानक

By admin | Updated: May 11, 2014 22:55 IST

घाण अन् कचरा प्रवाशांच्या नाकीनऊ , आगार व्यवस्थापन निद्रिस्त

मंगरूळपीर: सदैव प्रवाशाच्चया सेवेत ही बिरुदावली घेउन शेखी मिरवणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मंगरुळपीर बसस्थानक सद्यस्थितीत विविध समस्याचे माहेरघर बनल्याचे दिसून येत आहे. या बसस्थानकासमोर प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले असून अनेक बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी बनली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे अनेकांना बसस्थानकावर जावे लागते. मात्र लांबपल्लयाच्या बसगाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना दीर्घकाळ बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. परिणामी प्रवाश्यांचे नियोजन कोलमडते याच कारणामुळे अनेकांना नाईलाजास्तव खाजगी वाहनाकडे धाव घ्यावी लागते. एकेकाळी हे आगार उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर होत. े परंतु अलिकडील काळातील नियोजनाचा अभाव असल्याने दिवसेंदिवस उत्पन्न घट होत असल्याचे दिसून येत आहे ** या ठिकाणी पिण्याच्या पाणी व्यवस्था आहे. मात्र हे पिण्याचे पाणी दर्शनी भागात नसल्याने प्रवाशांना ते दिसत नाही. त्यामुळे पाण्याची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी वाहनस्थळ आहे. मात्र नेमके वाहन प्रवेशद्वारासमोर उभे राहत असल्याने प्रवाशांना येथून मार्ग काढणे अतिशय कठीण जात असल्याचे दिसून येते. तसेच प्रवाशासमोर अँटो उभे राहत असल्याने अनेकदा मोठा खोळंबा निर्माण होत आहे. अशा अनेक समस्थानी बसस्थानकाला घेरले असून येथील विविध समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गात केली जात आहे. ** बसस्थानकात अनेकदा कचरा साचलेला असतो. तसेच बसस्थानकासभोवताल घाण पाण्याचे डबके असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी व डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होउन या डासांमुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. तसेच बसस्थानकाला मागील बाजूने संरक्षक भिंत नसल्याने परिसरात गुरांचा संचार हे नित्यातीच बाब झाली आहे. याशिवाय परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. परंतु सदर स्वच्छतागृहाची आजमितीला कमालीची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे ** स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव असल्यामुळे येथील शौचालय अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. याशिवाय अकोलाकडे जाणार्‍या बसगाड्या ज्या ठिकाणापासून निघतात.त्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याकरीता अखंड खुच्र्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यामधील अनेक खुच्र्या पूर्णत: निकामी झाल्याने प्रवाशांना खाली बसून बसगाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. ** एस.टी.चा प्रवास सुखदायक असे म्हटल्या जाते.परंतु बहुतांश बसगाड्या हय़ा भंगार झाल्याने कोणत्या क्षणी रस्त्यामध्ये बंद पडतात. शिवाय अनेक गाड्याचे पार्ट निकामी झाल्याने या गाड्याच्या अचानकपणे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटीचा प्रवास धोकादायक म्हणण्याची पाळी प्रवाशावर आली असे म्हटल्यास नवल वाटणार नाही