शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

समस्यांच्या फेर्‍यात मंगरुळपीर बसस्थानक

By admin | Updated: May 11, 2014 22:55 IST

घाण अन् कचरा प्रवाशांच्या नाकीनऊ , आगार व्यवस्थापन निद्रिस्त

मंगरूळपीर: सदैव प्रवाशाच्चया सेवेत ही बिरुदावली घेउन शेखी मिरवणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मंगरुळपीर बसस्थानक सद्यस्थितीत विविध समस्याचे माहेरघर बनल्याचे दिसून येत आहे. या बसस्थानकासमोर प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले असून अनेक बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी बनली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे अनेकांना बसस्थानकावर जावे लागते. मात्र लांबपल्लयाच्या बसगाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना दीर्घकाळ बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. परिणामी प्रवाश्यांचे नियोजन कोलमडते याच कारणामुळे अनेकांना नाईलाजास्तव खाजगी वाहनाकडे धाव घ्यावी लागते. एकेकाळी हे आगार उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर होत. े परंतु अलिकडील काळातील नियोजनाचा अभाव असल्याने दिवसेंदिवस उत्पन्न घट होत असल्याचे दिसून येत आहे ** या ठिकाणी पिण्याच्या पाणी व्यवस्था आहे. मात्र हे पिण्याचे पाणी दर्शनी भागात नसल्याने प्रवाशांना ते दिसत नाही. त्यामुळे पाण्याची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी वाहनस्थळ आहे. मात्र नेमके वाहन प्रवेशद्वारासमोर उभे राहत असल्याने प्रवाशांना येथून मार्ग काढणे अतिशय कठीण जात असल्याचे दिसून येते. तसेच प्रवाशासमोर अँटो उभे राहत असल्याने अनेकदा मोठा खोळंबा निर्माण होत आहे. अशा अनेक समस्थानी बसस्थानकाला घेरले असून येथील विविध समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी प्रवासीवर्गात केली जात आहे. ** बसस्थानकात अनेकदा कचरा साचलेला असतो. तसेच बसस्थानकासभोवताल घाण पाण्याचे डबके असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी व डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होउन या डासांमुळे प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. तसेच बसस्थानकाला मागील बाजूने संरक्षक भिंत नसल्याने परिसरात गुरांचा संचार हे नित्यातीच बाब झाली आहे. याशिवाय परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. परंतु सदर स्वच्छतागृहाची आजमितीला कमालीची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे ** स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव असल्यामुळे येथील शौचालय अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. याशिवाय अकोलाकडे जाणार्‍या बसगाड्या ज्या ठिकाणापासून निघतात.त्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याकरीता अखंड खुच्र्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यामधील अनेक खुच्र्या पूर्णत: निकामी झाल्याने प्रवाशांना खाली बसून बसगाडीची प्रतिक्षा करावी लागत आहे. ** एस.टी.चा प्रवास सुखदायक असे म्हटल्या जाते.परंतु बहुतांश बसगाड्या हय़ा भंगार झाल्याने कोणत्या क्षणी रस्त्यामध्ये बंद पडतात. शिवाय अनेक गाड्याचे पार्ट निकामी झाल्याने या गाड्याच्या अचानकपणे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटीचा प्रवास धोकादायक म्हणण्याची पाळी प्रवाशावर आली असे म्हटल्यास नवल वाटणार नाही