शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

सर्वच कर्जदार शेतक-यांना कर्ज उपलब्ध करा!

By admin | Updated: April 24, 2015 02:08 IST

‘लोकमत’च्या परिचर्चेत उमटला सूर; कर्जाचे पुनर्गठण करुन दिलासा द्या.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठन करुन,कर्जदार सर्वच शेतकर्‍यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज उपलब्ध करुन दिले पाहीजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर गेल्या खरीप हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, येत्या खरीप हंगामात कर्जदार शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे; परंतु, कर्जाची परतफेड न करणार्‍या शेतकर्‍यांचे पुनर्गठण करून, कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने यासंदर्भात लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रामदास मालवे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत गेल्या वर्षी बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची बँकांसह शेतकर्‍यांना माहिती देण्यात आली पाहिजे तसेच राष्ट्रीयीकृत बँकांसह बहुतांश कर्जदार शेतकरी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून, सर्वच कर्जदार शेतकर्‍यांना पीक कर्जउपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत दिली पाहिजे. कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठण करून, सर्वच शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध झाल्यास, दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या चर्चेत उमटला. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी पुरेल असे वाढीव कर्ज उपलब्ध झाले पाहीजे, असा विचारही या चर्चेत मांडण्यात आला.