शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

सर्वच कर्जदार शेतक-यांना कर्ज उपलब्ध करा!

By admin | Updated: April 24, 2015 02:08 IST

‘लोकमत’च्या परिचर्चेत उमटला सूर; कर्जाचे पुनर्गठण करुन दिलासा द्या.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठन करुन,कर्जदार सर्वच शेतकर्‍यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज उपलब्ध करुन दिले पाहीजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर गेल्या खरीप हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, येत्या खरीप हंगामात कर्जदार शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे; परंतु, कर्जाची परतफेड न करणार्‍या शेतकर्‍यांचे पुनर्गठण करून, कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने यासंदर्भात लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रामदास मालवे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत गेल्या वर्षी बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची बँकांसह शेतकर्‍यांना माहिती देण्यात आली पाहिजे तसेच राष्ट्रीयीकृत बँकांसह बहुतांश कर्जदार शेतकरी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून, सर्वच कर्जदार शेतकर्‍यांना पीक कर्जउपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत दिली पाहिजे. कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठण करून, सर्वच शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध झाल्यास, दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या चर्चेत उमटला. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी पुरेल असे वाढीव कर्ज उपलब्ध झाले पाहीजे, असा विचारही या चर्चेत मांडण्यात आला.