शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

सर्वच कर्जदार शेतक-यांना कर्ज उपलब्ध करा!

By admin | Updated: April 24, 2015 02:08 IST

‘लोकमत’च्या परिचर्चेत उमटला सूर; कर्जाचे पुनर्गठण करुन दिलासा द्या.

अकोला: दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठन करुन,कर्जदार सर्वच शेतकर्‍यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज उपलब्ध करुन दिले पाहीजे, असा सूर गुरुवारी लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला. गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर गेल्या खरीप हंगामात पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, येत्या खरीप हंगामात कर्जदार शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे; परंतु, कर्जाची परतफेड न करणार्‍या शेतकर्‍यांचे पुनर्गठण करून, कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने यासंदर्भात लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रामदास मालवे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत गेल्या वर्षी बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठण करुन, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची बँकांसह शेतकर्‍यांना माहिती देण्यात आली पाहिजे तसेच राष्ट्रीयीकृत बँकांसह बहुतांश कर्जदार शेतकरी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून, सर्वच कर्जदार शेतकर्‍यांना पीक कर्जउपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत दिली पाहिजे. कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे सरसकट पुनर्गठण करून, सर्वच शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध झाल्यास, दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या चर्चेत उमटला. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी पुरेल असे वाढीव कर्ज उपलब्ध झाले पाहीजे, असा विचारही या चर्चेत मांडण्यात आला.