शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अवैध बांधकामांचा विळखा

By admin | Updated: September 9, 2015 00:27 IST

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे.

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे. विशेष म्हणजे पालिकेतील नोंदीनुसार केवळ ६५ अनधिकृत बांधकाम असल्याचे दिसून येते. मात्र, शहरात प्रत्यक्ष पाहणी केल्यास नोंद अगदीच किरकोळ असल्याचे दिसून येते.शहराचा विस्तार काही वर्षांपासून वाढत आहे. अनेक नागरिकांनी बाँड तसेच करारावर घरे बांधली आहेत. नवीन तसेच जुना जालना भागात काहींनी मात्र अनधिकृत बांधकामे करीत नियम धाब्यावर बसविले आहेत. २०१४ मध्ये ५६ अनधिकृत बांधकामे तर २०१५ मध्ये अनधिकृत बांधकामांची पालिकेकडे नोंद आहे. मात्र शहराचा विस्तार पाहता ही नोंद असून, नसल्यासारखीच आहे. अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही संघटनांसह नागरिकांनी केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच मुख्य रस्त्यांवर अनधिकृत बांधकामासोबतच अतिक्रमणे वाढली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी पालिकेकडूनच अशा बांधकामांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे. वर्षभरात पालिका ६५ अनधिकृत बांधकामे सांगत असली तरी मुळात अशी बांधकामे हजारोंच्या संख्येत असल्याची माहिती आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अरुंद होण्यासोबतच पालिकेच्या जागाही काही ठिकाणी गिळंकृत होत आहेत. (प्रतिनिधी)शहरातील काही भागात नियमानुसार रजिस्ट्रीच होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांकडे मालमत्तापत्रक नाही. असे असले तरी शहरात शेकडो घरे उभी आहेत. रजिस्ट्रीच होत नाही तर पालिकेने बांधकाम परवानगी कोणत्या मुद्यावर दिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. कारवाई सुरूच४नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनेकांना स्वच्छता निरीक्षकांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून वेळावेळी कारवाई करण्यात येते. अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.