शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे बागायती शेती संकटात

By admin | Updated: July 8, 2014 21:51 IST

पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात हाहाकार माजला असतानाच वन्यप्राण्यांमुळे बागायती शेतीही संकटात आली आहे.

मूर्तिजापूर: पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात हाहाकार माजला असतानाच वन्यप्राण्यांमुळे बागायती शेतीही संकटात आली आहे. तालुक्यातील आमतवाडा येथील एक ा शेतकर्‍याची चार एकरातील पर्‍हाटी वन्यप्राण्यांनी फस्त केल्यामुळे या शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तथापि, सिंचनाची व्यवस्था असणार्‍या शेतकर्‍यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे; परंतु वन्यप्राणी या पिकाचा पूर्णपणे सत्यानाश करीत आहेत. हरीण, रानडुक्कर, माकडे आदी प्राण्यांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. याचा फटका आमतवाडा येथील प्रशांत शेषराव वहिले या शेतकर्‍याला बसला असून, त्यांनी चार एकर क्षेत्रात लागवड केलेली मान्सूनपूर्व संपूर्ण कपाशी हरिणांनी फस्त केली आहे. वहिले यांनी सहा हजार रुपये किमतीचे बियाणे आणले. त्याशिवाय लागवड, खते आणि सिंचनासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला; परंतु वन्यप्राण्यांनी ती कपाशी पूर्णपणे नष्ट केल्याने या शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे शेतकरी जीवावर उदार होऊन पिकांच्या रक्षणासाठी शेतात रात्रभर जागरण करीत आहेत. वनविभागाने शेतकर्‍यांची स्थिती लक्षात घेऊन वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आर्जव शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.