शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे बागायती शेती संकटात

By admin | Updated: July 8, 2014 21:51 IST

पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात हाहाकार माजला असतानाच वन्यप्राण्यांमुळे बागायती शेतीही संकटात आली आहे.

मूर्तिजापूर: पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात हाहाकार माजला असतानाच वन्यप्राण्यांमुळे बागायती शेतीही संकटात आली आहे. तालुक्यातील आमतवाडा येथील एक ा शेतकर्‍याची चार एकरातील पर्‍हाटी वन्यप्राण्यांनी फस्त केल्यामुळे या शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तथापि, सिंचनाची व्यवस्था असणार्‍या शेतकर्‍यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे; परंतु वन्यप्राणी या पिकाचा पूर्णपणे सत्यानाश करीत आहेत. हरीण, रानडुक्कर, माकडे आदी प्राण्यांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. याचा फटका आमतवाडा येथील प्रशांत शेषराव वहिले या शेतकर्‍याला बसला असून, त्यांनी चार एकर क्षेत्रात लागवड केलेली मान्सूनपूर्व संपूर्ण कपाशी हरिणांनी फस्त केली आहे. वहिले यांनी सहा हजार रुपये किमतीचे बियाणे आणले. त्याशिवाय लागवड, खते आणि सिंचनासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला; परंतु वन्यप्राण्यांनी ती कपाशी पूर्णपणे नष्ट केल्याने या शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे शेतकरी जीवावर उदार होऊन पिकांच्या रक्षणासाठी शेतात रात्रभर जागरण करीत आहेत. वनविभागाने शेतकर्‍यांची स्थिती लक्षात घेऊन वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आर्जव शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.