शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सुटीचाही आला मुलांना कंटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात पहिल्यांदाच वर्षभर शाळाच भरली नाही. शाळेला बुट्टी मारणारे ‘बॅक बेंचर’ही अक्षरश: शाळेत जाण्यासाठी आसुसले. पण शाळा काही उघडली नाही. काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात शाळांची लांबलेली सुटी मुलांना भावली मात्र या सुटीचाही कंटाळा आला. दुसरीकडे माेबाइलला हात लावू नका, असे दरडावणारे पालक आता मुलांसाठी स्वतंत्र माेबाइल खरेदी करून घे माेबाइल, बस अभ्यासाला अशा पवितत्र्यात आले. असे हे आगळेवेगळे वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवून संपत आहे.

परीक्षेचीही झाली गंमत

परीक्षा म्हटलं की मुलांना प्रचंड धास्ती बसत असे; मात्र ऑनलाइन परीक्षेचा उडालेला गाेंधळ पाहून शाळेचीच परीक्षा घेतली गेली. मार्चमध्ये कोरोना अवतरल्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात घालण्यात आले. काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्यांची परीक्षा घेतली, त्यात पालकांनीच पेपर दिले. दहावीचा तर चक्क भूगोलाचा पेपरच रद्द करावा लागला. बारावीची कशीबशी परीक्षा झाली; पण रिझल्ट लावता-लावता बोर्डाच्या नाकीनऊ आले.

विद्यापीठाच्या परीक्षांचा घोळच घोळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. पण वेळेवर लाॅगीन न होणे, एका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याच अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मिळणे असे खेळ झाले. मग ती परीक्षा रद्द करून दुसऱ्यांदा आयोजन केले. तर ऐनवेळी विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा घेत असल्याचा निरोप देण्यात आला.

काेराेना तपासणीच्या रांगेत शिक्षक

कोरोना संकटाची काळजी घेत २३ नोव्हेंबरपासून काही वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. तेव्हा सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सव्वाशे शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.

आश्रमशाळा ‘अनलाॅक’ नाहीतच

शालेय शिक्षणाच्या अखत्यारीतील शाळांमध्ये २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र विद्यार्थी उपस्थिती अगदीच नगण्य आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकासच्या अखत्यारीतील आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाल्यावरही त्या अनेक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

‘फीट इंडिया’त जिल्हा राज्यात तिसरा

फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये अकोला जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ६६.३८ टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्ह्याचा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.