शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

सुटीचाही आला मुलांना कंटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात पहिल्यांदाच वर्षभर शाळाच भरली नाही. शाळेला बुट्टी मारणारे ‘बॅक बेंचर’ही अक्षरश: शाळेत जाण्यासाठी आसुसले. पण शाळा काही उघडली नाही. काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात शाळांची लांबलेली सुटी मुलांना भावली मात्र या सुटीचाही कंटाळा आला. दुसरीकडे माेबाइलला हात लावू नका, असे दरडावणारे पालक आता मुलांसाठी स्वतंत्र माेबाइल खरेदी करून घे माेबाइल, बस अभ्यासाला अशा पवितत्र्यात आले. असे हे आगळेवेगळे वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवून संपत आहे.

परीक्षेचीही झाली गंमत

परीक्षा म्हटलं की मुलांना प्रचंड धास्ती बसत असे; मात्र ऑनलाइन परीक्षेचा उडालेला गाेंधळ पाहून शाळेचीच परीक्षा घेतली गेली. मार्चमध्ये कोरोना अवतरल्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात घालण्यात आले. काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्यांची परीक्षा घेतली, त्यात पालकांनीच पेपर दिले. दहावीचा तर चक्क भूगोलाचा पेपरच रद्द करावा लागला. बारावीची कशीबशी परीक्षा झाली; पण रिझल्ट लावता-लावता बोर्डाच्या नाकीनऊ आले.

विद्यापीठाच्या परीक्षांचा घोळच घोळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. पण वेळेवर लाॅगीन न होणे, एका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याच अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मिळणे असे खेळ झाले. मग ती परीक्षा रद्द करून दुसऱ्यांदा आयोजन केले. तर ऐनवेळी विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा घेत असल्याचा निरोप देण्यात आला.

काेराेना तपासणीच्या रांगेत शिक्षक

कोरोना संकटाची काळजी घेत २३ नोव्हेंबरपासून काही वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. तेव्हा सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सव्वाशे शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.

आश्रमशाळा ‘अनलाॅक’ नाहीतच

शालेय शिक्षणाच्या अखत्यारीतील शाळांमध्ये २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र विद्यार्थी उपस्थिती अगदीच नगण्य आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकासच्या अखत्यारीतील आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाल्यावरही त्या अनेक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

‘फीट इंडिया’त जिल्हा राज्यात तिसरा

फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये अकोला जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ६६.३८ टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्ह्याचा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.