शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचाही आला मुलांना कंटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : सांग सांग भोलानाथ सुट्टी मिळेल काय, हे विद्यार्थ्यांचे आवडते गाणे. पण यंदा इतिहासात पहिल्यांदाच वर्षभर शाळाच भरली नाही. शाळेला बुट्टी मारणारे ‘बॅक बेंचर’ही अक्षरश: शाळेत जाण्यासाठी आसुसले. पण शाळा काही उघडली नाही. काेराेनाच्या पहिल्या टप्प्यात शाळांची लांबलेली सुटी मुलांना भावली मात्र या सुटीचाही कंटाळा आला. दुसरीकडे माेबाइलला हात लावू नका, असे दरडावणारे पालक आता मुलांसाठी स्वतंत्र माेबाइल खरेदी करून घे माेबाइल, बस अभ्यासाला अशा पवितत्र्यात आले. असे हे आगळेवेगळे वर्ष शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवून संपत आहे.

परीक्षेचीही झाली गंमत

परीक्षा म्हटलं की मुलांना प्रचंड धास्ती बसत असे; मात्र ऑनलाइन परीक्षेचा उडालेला गाेंधळ पाहून शाळेचीच परीक्षा घेतली गेली. मार्चमध्ये कोरोना अवतरल्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात घालण्यात आले. काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने चिमुकल्यांची परीक्षा घेतली, त्यात पालकांनीच पेपर दिले. दहावीचा तर चक्क भूगोलाचा पेपरच रद्द करावा लागला. बारावीची कशीबशी परीक्षा झाली; पण रिझल्ट लावता-लावता बोर्डाच्या नाकीनऊ आले.

विद्यापीठाच्या परीक्षांचा घोळच घोळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. पण वेळेवर लाॅगीन न होणे, एका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याच अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मिळणे असे खेळ झाले. मग ती परीक्षा रद्द करून दुसऱ्यांदा आयोजन केले. तर ऐनवेळी विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा घेत असल्याचा निरोप देण्यात आला.

काेराेना तपासणीच्या रांगेत शिक्षक

कोरोना संकटाची काळजी घेत २३ नोव्हेंबरपासून काही वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. तेव्हा सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सव्वाशे शिक्षक पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.

आश्रमशाळा ‘अनलाॅक’ नाहीतच

शालेय शिक्षणाच्या अखत्यारीतील शाळांमध्ये २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र विद्यार्थी उपस्थिती अगदीच नगण्य आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकासच्या अखत्यारीतील आश्रमशाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाल्यावरही त्या अनेक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

‘फीट इंडिया’त जिल्हा राज्यात तिसरा

फीट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये अकोला जिल्हा राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ६६.३८ टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर मुंबई असून, लातूर जिल्ह्याचा सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.