शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

नामांकित कॉलेजमधील प्रवेश हाऊसफुल्ल

By admin | Updated: July 8, 2014 00:18 IST

विद्यार्थ्यांची शोधाशोधा कराव्या लागणार्‍या महाविद्यालयांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी स्वत:हून गर्दी केली.

अकोला : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर झालेला दहावीचा निकाल यंदा रेकॉर्डब्रेक होता. त्यामुळे विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोधा कराव्या लागणार्‍या महाविद्यालयांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी स्वत:हून गर्दी केली. अकोला जिल्ह्यात जवळपास १४0 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये अकराव्या वर्गासाठी २३ हजार २२0 जागा आहेत. यावर्षी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजार ५0५ इतकी आहे. उत्तीर्ण होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिले तरी १ हजार ७१५ इतक्या जागा रिकाम्या राहणार आहेत. दहावीचा ऑनलाईन निकाल १७ जूनला जाहीर झाला. निकालाच्या दुसर्‍या दिवशीपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी सुरू केली. २६ जूनला गुणपत्रिका मिळाल्यानंतर अकरावीत प्रवेशासाठी गर्दी अधिक वाढली. शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांंनी यावर्षी चांगलाचा जोर लावला. मागील काही वर्षांपासून कोचिंग क्लासेसवालेदेखील महाविद्यालयाच्या व्यवसायात उतरले आहेत. शहरातील काही कोचिंग क्लासेसच्या मालकांनी स्वत: महाविद्यालये सुरू केली आहेत. स्वत:च्या कॅप्सूल बॅचेस या महाविद्यालयांमध्ये घेण्यात येतात. त्यामुळे ही महाविद्यालये केवळ नावापुरतीच असून, ट्यूशनचे अड्डे बनले आहेत. चांगले गुण असलेल्या ठरावीक मुलांनाच या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे महाविद्यालयांचा निकाल नेहमीच चांगला लागतो. परिणामी या महाविद्यालयांमध्येदेखील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांंचा ओढा वाढला आहे. काही वर्षांंपूर्वी शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांंमध्ये चढाओढ राहत असे; परंतु कोचिंग क्लासेसचा व्यवसाय जसा वाढला, तसे महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांंची गर्दी ओसरली. आता केवळ नावापुरती अँडमिशन असली म्हणजे झाले, असे मन विद्यार्थ्यांंनी बनविले आहे. त्यामुळेच त्यांचा ओढा कोचिंग क्लासेसवाल्यांच्या महाविद्यालयांकडे वाढला आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १४0 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये १ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ जुलैपासून पहिल्या यादीत नाव असणार्‍यांचे प्रवेश सुरू झाले. ११ जुलैपासून प्रतीक्षा यादीत नाव असणार्‍या विद्यार्थ्यांंचे प्रवेश सुरू होणार आहेत. १५ जुलैपर्यंंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात अकरावीच्या २३ हजार २२0 जागा असून, यावर्षी २१ हजार ५0५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांंपेक्षा दोन हजार जागा जास्त आहेत. त्यातही अनेक विद्यार्थी आयटीआय, तंत्रनिकेतमध्ये (पॉलिटेक्निक) प्रवेश घेतात.जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंपेक्षा दोन हजार जागा जास्त असल्या तरीही विद्यार्थी व पालक नामांकित विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी धाव घेतात. त्यामुळे काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांंची झुंबड उडत आहे तर काही विद्यालयांना विद्यार्थी मिळत नाही आहेत.