शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

संतोष येलकर अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची वाट लागली असून, नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने ...

संतोष येलकर

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची वाट लागली असून, नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने करावयाच्या दुरुस्तीची कामे मात्र अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली जिल्ह्यातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसल्याने नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी रस्ते, पूल आणि रपटे वाहून गेले. रस्ते वाहून गेल्याने काही गावांचा संपर्कदेखील तुटला होता. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी रस्त्यांची वाट लागली असून, रस्ते समस्यांचा सामना ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु पूर ओसरल्यानंतर महिना उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील ग्रामीण भागात तातडीच्या रस्ते दुरुस्ती कामांना अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लागणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी

७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात नुकसान झालेल्या रस्ते, पूल व रपट्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु उपलब्ध निधीतून तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे मात्र अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.

अंदाजपत्रके तयार; पण

निविदा प्रक्रिया बाकी!

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तातडीने करावयाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत कामांची अंदाजपत्रके तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु १५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी निविदाप्रक्रिया पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. निविदा मागविण्यासह कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने, तातडीच्या रस्ते दुरुस्तीची कामे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील तातडीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी ‘डीपीसी’कडून निधी उपलब्ध झाला असून, कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत. १५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी लवकरच निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एन. जी. अघम

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद