शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने जिल्हा होरपळतोय!

By admin | Updated: April 17, 2016 01:09 IST

गतवर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ: नागरिकांची पायपीट.

वाशिम: एप्रिल महिन्यातील पंधरवड्याला सुरुवात होत नाही, तोच पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. प्रशासनातर्फे तात्पुरत्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असली, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील ह्यहंडाह्ण मात्र कायम असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाचा र्‍हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतूमानात बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, आ ता पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. २0१५ च्या उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाने ४३९ गावे पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली होती. याच वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २00 गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी ह्यपाण्याह्णसारखा ओतण्यात आला. त्यामुळे साहजिकच २0१६ च्या उन्हाळ्यात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट अपेक्षित होती; मात्र प्रत्यक्षात पाणीेटंचाईग्रस्त गावांच्या यादीत १२२ गावांची भर पडली आहे. त्यामुळे जलयुक्त अभियानांतर्गतच्या कामांचा दर्जा प्रकर्षाने समोर येत आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले, त्यापैकी निम्यापेक्षा अधिक गावे प्रशासनानेच संभाव्य पाणीटंचाईग्रस्त म्हणून कृती आराखड्यात समाविष्ठ केलेली आहेत. चालू वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात ५६१ गावे पाणीटंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत. या गावांमध्ये तात्पुरत्या उपाययोजनांसाठी ५ कोटी ६८ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. यामधून ४१७ विहीर अधिग्रहण, ८१ टँकर, ४३ नळ योजनांची दुरूस्ती, सात तात्पुरत्या नळ योजना, १0५ नवीन बोअर वेल आदी उपाययोजना आहे त. जिल्हा प्रशासनाने १५३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कृती आराखड्यात समाविष्ठ नसलेल्या गावांमध्येही पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. शिरपूर जैन परिसरातील पांगरखेडा, किन्ही घोडमोड, खंडाळा, बोराळा, मालेगाव तालुक्यातील मेडशी, काळाकामठा, रिधोरा, वाशिम तालुक्यातील माळेगाव, काटा, रिसोड तालुक्यातील कवठा, करंजी आदी गावांमध्ये पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. ग्रामीण भागात वीज भारनियमन घेतले जात असल्याने जलकुंभ पाण्याने भरण्यासाठी प्रचंड विलंब होत आहे. परिणामी, तीन दिवसांवरचा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांवर गेला असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. जलपातळीत कमालिची घट झाल्याने बोअरवेल कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होत आहे. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता घामाघूम होत असल्याचे दिसून येते.