शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

शेतकर्‍यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी

By admin | Updated: June 17, 2014 20:12 IST

अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादन आणि दर्जा खालावल्याने यंदा बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली

मूर्तिजापूर : गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादन आणि दर्जा खालावल्याने यंदा बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी करण्यात येत आहे.पावसाळा सुरू झाला असला तरी, मान्सूनच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही हजेरी लावली नसल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून, पेरणीसाठी त्यांना मान्सूनच्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे; मात्र बियाण्यांच्या किमती दुपटीने वाढल्यामुळे शेतकर्‍यांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे. गतवर्षीची अतिवृष्टी आणि यंदा फे ब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे खरीप आणि रब्बी पिकांची ऐशीतैशी झाल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. नेहमीच आशेवर जगणार्‍या बळीराजाने धीर न सोडता कसेबसे करीत पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली; परंतु गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांच्या उत्पादनासह दर्जाही खालावला. दुसरीकडे बियाण्यांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली, तर उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांनी जवळचा सर्व माल विकला. त्यामुळे त्यांच्याकडे पेरणीसाठी बियाणेही उरले नाही. भरीसभर दर्जा खालावल्यामुळे शेतकर्‍यांनी स्वत:जवळचे सोयाबीन बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासावी, असा सल्लाही कृषी विभागाकडून देण्यात येत असून, एकीकडे बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, तर स्वत:जवळ असलेल्या बियाण्यांची घटलेली उगवण क्षमता, अशा दोन समस्येत शेतकरी सापडला आहे. म्हणूनच शासनाने शेतकर्‍यांना अनुदान तत्त्वावर यंदा ७५ टक्के बियाण्यांचे वाटप करावे, तसेच विशेष घटक योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी मिळणार्‍या एक लक्ष रुपयांच्या अनुदानातही वाढ करून ते तीन लक्ष करावे, अशी मागणी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष आणि जांभा खुर्दचे माजी सरपंच राजू साहेबराव वानखडे आणि तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.