शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

बंद बसेसमुळे हाल

By admin | Updated: May 10, 2014 23:44 IST

तोकड्या बस सेवेमुळे हजारो प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो.

सिंदखेडराजा : तालुक्यात सर्वात मोठे शहर वजा गाव असलेले साखरखेर्डा हे आडवळणी असून, येथे २0 हजार लोकसंख्या आहे. मेहकर, चिखली, खामगाव आगाराने नियमीत चालणार्‍या बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तोकड्या बस सेवेमुळे हजारो प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. सिंदखेडराजा पासून ६0 किमी, चिखलीपासून ३५ किमी आणि मेहकरपासून २२ किमी अंतरावर साखरखेर्डा गाव आहे. पलसिद्ध महास्वामी यांचा १ वर्षापूर्वीचा मठ आणि प.पू.प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचे संस्थान यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून या नगरीत भाविक येत असतात. २५ एप्रिल ते ५ मे या ११ दिवसांच्या कालावधीत सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांचा अमृत महोत्सव आणि नविन मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे. या महोत्सवात किमान ५0 हजाराहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. येणार्‍या भाविकांना चिखली,मेहकर, खामगाव, जालना पर्यंत येणे सोपे होते. परंतु तेथून साखरखेर्डा जाणे बस नसल्यामुळे अवघड झाले होते. मेरा चौकी, लव्हाळा चौकी आणि दुसरबीड येथे येवून साखरखेर्डा जाणारे ऑटो, काळीपिवळी यासारखे खासगी वाहने शोधावी लागतात. तीही खचाखच भरल्यानंतरच पुढील प्रवासाला निघते, त्यातही दुप्पट भाडे असा हा जीवघेणा प्रवास साखरखेर्डा येथे येणार्‍या प्रवाशांना करावा लागतो. मेहकर आगाराने तर नियमीत चालणारी आणि नियमापेक्षा अधिक उत्पन्न देणारी साखरखेर्डा, जालना व परत जालना, साखरखेर्डा, सवडद मुक्कामी जाणारी बस १५ दिवसांपासून बंद आहे. याबरोबरच अनेक बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यात काही बसेसचे टायर बसणे, नळी लिकेज होणे हा नित्याचा क्रम झाला आहे. यावर मात्र लोकप्रतिनिधीसह संबंधितांचेही साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. चिखली आगाराकडे चिखली-लोणार, चिखली-मेहकर, चिखली-वाशिम ह्या बंद केलेल्या बसेस सुरु करण्याची वारंवार मागणी करुनही बसेस सुरु करण्यात नाहीत. खामगाव आगाराचे आगारप्रमुख यांनी साखरखेर्डा मार्गावरुन अकोला- किनगावजट्ट, खामगाव-लोणार, खामगाव-जालना ह्या तीन बसेस धावतात. त्यात खामगाव ते जालना या बसमध्ये नियमापेक्षा दुप्पट प्रवाशी वाहतूक होते. साखरखेर्डा येथून बसणार्‍या प्रवाशांना बसमध्ये जागा मिळत नाही. ८५ किमी उभे राहून त्यांना प्रवास करावा लागतो. खामगाव ते जालना-औरंगाबाद ही पुन्हा एक बस सुरु करावी. तसेच खामगाव ते शेंदुर्जन ही बंद केलेली बस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी जोर धरत असून, तेथे आमदाराचे पत्र मागितले जाते. प्रवाशांना भर उन्हाळ्यात कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागते. तेव्हा बंद केलेल्या बसेस तात्काळ पुर्ववत सुरु कराव्या, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.