शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

शेतकऱ्यांच्या मुलांनी लघुपटातून मांडले वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:19 IST

अकोट : दुष्काळ, नापिकी, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर काेराेना काळात आभाळच काेसळले. पण शेतकरी बांधवांनी परिस्थितीशी दाेन ...

अकोट : दुष्काळ, नापिकी, निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर काेराेना काळात आभाळच काेसळले. पण शेतकरी बांधवांनी परिस्थितीशी दाेन हात करीत अविरत काम सुरू ठेवून जगाच्या पाेशिंद्याची भूमिका पार पाडली. काेराेनाच्या संकटात अनेक काेराेना याेद्ध्यांचे काैतुक झाले, मात्र बळीराजा दुर्लक्षित राहिला. काेराेना संकट काळातील शेतकऱ्यांचे वास्तव अकाेट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनीच लघुपटाच्या माध्यमातून समाेर आणले आहे.

कोरोना या जागतिक आरोग्य संकटातील घटनेवर आधारित ग्रामीण भागातील वास्तव मांडत सामाजात जनजागृती तसेच शेतकरी कुटुंब व गावाचा सामाजिक संदेश देणारा ‘कोरोना टू गाव’ या लघुपटाची निर्मिती अकोट कला मंचने केली आहे. नुकताच या लघुचित्रपटाचे प्रदर्शन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या अस्सल लघुचित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या लाइव्ह प्रदर्शन कार्यक्रमाला तीन हजारांच्या वर प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली.

अकोट येथील कला मंचचे योगेश वाकोडे या युवकाने लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांनी अभिनय केला असून, कोणताही खर्च व उत्पन्नाचे साधन म्हणून हा लघुचित्रपट बनविण्यात आलेला नाही. या जनजागृती लघुचित्रपट माध्यमातून काही शेतकरी कुटुंबांतील वास्तव, शेतीचे महत्त्व हे कोरोना या महामारी संकटात उजळून निघाले. नोकरी व लग्नाची चिंताजनक परिस्थिती व काही मुलींचा शेतकरी नवऱ्याबद्दलचा दृष्टिकोन पाहता शेतीचे महत्त्व, कोरोनापासून प्रत्येकाचे आरोग्य, गावाचा विकास, गावात आपुलकी, काळजी-स्नेहाचे नाते, शहर व गावातील हवा, पाणी बदल रेखाटला आहे. या लघुपटातील संवाद ओघवत्या भाषेत आहेत. तालुक्यातील पिंप्री जैनपूर या गावात चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून शेतकरी कुटुंब व बहुतांश गावकऱ्यांचा त्यात समावेश आहे. समाजासाठी जनजागृती म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःजवळील साधनसामग्री वापरत योगदान दिले आहे.

यांनी घेतला पुढाकार

कोरोना-टु-गाव या लघुचित्रपटाचे निर्माता - योगेश वाकोडे, दिग्दर्शक - विश्वास आप्पा कुरवाडे, हरीश ढवळे, कथालेखक - विजय शिंदे, साहाय्यक - संदीप ढोक, आदर्श अग्रवाल, रवी पवार, परीक्षित बोचे, अमोल नगरे, मोहन परळकर, महेंद्र सोनोने, विशाल तट्टे, अतुल मानकर तसेच अभिनय - गीताआई भगत, भास्कर उर्फ बाबासाहेब भगत, भोजराज भगत, विजय शिंदे, अनंता भगत, ज्ञानेश्वर पखान, प्रशांत भगत, गौरव भगत, दीपक भगत, गोवधन बानेरकर, श्याम कोल्हे, नामदेव बानेरकर, वैभव भगत यांचा असून अरविंद बानेरकर, लकी इंगळे यांनी या लघुपटासाठी पुढाकार घेतला.