शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

नफ्यासाठी जनावरे कत्तलखान्यात !

By admin | Updated: May 12, 2014 00:04 IST

सामाजिक संघटना, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

शेगाव : शासन स्तरावर पशुसंवर्धनाचे धडे शेतकर्‍यांना दिले जात असतानाच परंतु बैल, गायी, म्हशी यांची कमिशन बेसवर कसायांना विक्री केली जात आहे. यासाठी गावागावात दलालही सक्रिय असून मोठ्या प्रमाणात नफा कमविणे सुरू असून जनावरांची रवानगी मात्र कत्तलखान्यात होत आहे. जनावरांची कत्तल थांबविण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नाही. याकडे शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. या प्रकाराने जनावरांच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे व जनावरांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आपलीच मालकी समजून हे नफेखोर राजरोसपणे कत्तलखान्याकडे जनावरांची वाहतूक करीत आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासन यावर पायबंद घालणार किंवा नाही, असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे. दुग्ध व्यवसायासाठी शासन शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते. शासन स्तरावरील या सर्व गोष्टी विकसनशील भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. तरी आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी दुभत्या गाई, शेतात काम करणारे बैल, दुभत्या म्हशी खटिकांना विकून मोकळा होत आहे. अशीच जनावरांची अवैध कत्तल सुरू राहिली तर जनावरे नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे शासन अनुदानावर जनावरे देण्याच्या अनेक योजना राबवित आहे. परंतु जनावरांची कत्तल व कत्तलखाने बंद करण्यासाठी शासन कठोर कायदा का करीत नाही, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. भारत कृषिप्रधान देश समजला जातो. गाईला गोमाता म्हटले जाते. तर दुसरीकडे माय समजल्या जाणार्‍या गायीला चाबकाचे फटकारे मारत कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन कत्तल करणार्‍यांना सर्रासपणे पाठिंबा देतात. ही गंभीर बाब असून लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची समिती तयार करून जनावरांची अवैध कत्तल कशी थांबेल याचा विचार करण्याची गरज आहे. केंद्र शासनाने व राज्य शासनाने कठोर कायदा करून जनावरांची अवैध कत्तल करणार्‍यांवर बंदी कशी आणता येईल याच्या चिंतनाची आज आवश्यकता आहे. याशिवाय अवैधपणे गुरे वाहून नेणार्‍या कसायांना पकडून त्यांच्य ताब्यातून गुरे सोडवून कसायांना पोलिसांच्या स्वाधीन करावे. तेव्हाच जनावरांची अवैध कत्तल थांबू शकेल व शेतकरी सुखी होऊन खर्‍या अथार्ने देश कृषिप्रधान होईल. यासाठी शासनस्तरावर कठोर कायदा करून अंमलात आणण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.