शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
2
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
3
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
4
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा
5
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
6
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
7
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
8
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
9
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
10
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
11
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
12
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
13
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
14
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
15
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
16
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
17
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
18
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
19
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
20
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा

नफ्यासाठी जनावरे कत्तलखान्यात !

By admin | Updated: May 12, 2014 00:04 IST

सामाजिक संघटना, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

शेगाव : शासन स्तरावर पशुसंवर्धनाचे धडे शेतकर्‍यांना दिले जात असतानाच परंतु बैल, गायी, म्हशी यांची कमिशन बेसवर कसायांना विक्री केली जात आहे. यासाठी गावागावात दलालही सक्रिय असून मोठ्या प्रमाणात नफा कमविणे सुरू असून जनावरांची रवानगी मात्र कत्तलखान्यात होत आहे. जनावरांची कत्तल थांबविण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नाही. याकडे शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. या प्रकाराने जनावरांच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे व जनावरांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आपलीच मालकी समजून हे नफेखोर राजरोसपणे कत्तलखान्याकडे जनावरांची वाहतूक करीत आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासन यावर पायबंद घालणार किंवा नाही, असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे. दुग्ध व्यवसायासाठी शासन शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते. शासन स्तरावरील या सर्व गोष्टी विकसनशील भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. तरी आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी दुभत्या गाई, शेतात काम करणारे बैल, दुभत्या म्हशी खटिकांना विकून मोकळा होत आहे. अशीच जनावरांची अवैध कत्तल सुरू राहिली तर जनावरे नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे शासन अनुदानावर जनावरे देण्याच्या अनेक योजना राबवित आहे. परंतु जनावरांची कत्तल व कत्तलखाने बंद करण्यासाठी शासन कठोर कायदा का करीत नाही, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. भारत कृषिप्रधान देश समजला जातो. गाईला गोमाता म्हटले जाते. तर दुसरीकडे माय समजल्या जाणार्‍या गायीला चाबकाचे फटकारे मारत कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन कत्तल करणार्‍यांना सर्रासपणे पाठिंबा देतात. ही गंभीर बाब असून लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची समिती तयार करून जनावरांची अवैध कत्तल कशी थांबेल याचा विचार करण्याची गरज आहे. केंद्र शासनाने व राज्य शासनाने कठोर कायदा करून जनावरांची अवैध कत्तल करणार्‍यांवर बंदी कशी आणता येईल याच्या चिंतनाची आज आवश्यकता आहे. याशिवाय अवैधपणे गुरे वाहून नेणार्‍या कसायांना पकडून त्यांच्य ताब्यातून गुरे सोडवून कसायांना पोलिसांच्या स्वाधीन करावे. तेव्हाच जनावरांची अवैध कत्तल थांबू शकेल व शेतकरी सुखी होऊन खर्‍या अथार्ने देश कृषिप्रधान होईल. यासाठी शासनस्तरावर कठोर कायदा करून अंमलात आणण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.