शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शिर्ला गावचे ७५ सैनिक देशसेवेसाठी संरक्षण दलात, गावाला मिळाली वेगळी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

संतोषकुमार गवई शिर्ला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला गावचे ७५ हून अधिक एक सैनिक भारताच्या संरक्षण दलात विविध ...

संतोषकुमार गवई

शिर्ला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला गावचे ७५ हून अधिक एक सैनिक भारताच्या संरक्षण दलात विविध पदांवर डोळ्यात तेल घालून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत त्याबरोबरच भारत-पाकिस्तानच्या आतापर्यंत झालेल्या सर्व लढाई आणि अतिरेकीविरोधी कारवायात यशस्वी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये सैनिक कैलास निमकंडे शहीद झाला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध अनेक वेळा विविध मोठ्या लढाया देशाला लढाव्या लागल्या त्यामध्ये शिर्ला गावचे सैनिक प्रामुख्याने सहभागी होते. अलीकडच्या कारगिल युद्धातही आपला सहभाग नोंदवला.

२० मे २००५ रोजी जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमधील कालाकोट चौकीवर निकराची लढत देत ५ पाकिस्तानी अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्यात सैनिक कैलास काशीराम निमकंडे यशस्वी झाला मात्र यामध्ये तो शहीद झाला. गावच्या सैनिकांना ऊर्जा मिळावी यासाठी भलेमोठे स्मारक शहीद कैलास निमकंडे यांच्या नावाने शिर्ला गावात उभारले गेले आहे. शहीद कैलास देशासाठी लढून शहीद झाल्यानंतरही त्याचा चुलत भाऊ उमेश देवीदास निमकडे हा सध्या उपरोक्त ठिकाणी आपली सेवा देत आहे. शहीद कैलासचा सख्खा भाऊ विलास निमकंडे पुण्याच्या खडकवासला येथील डिफेन्स सिक्युरिटी कोरमध्ये आपली सेवा देत आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये राष्ट्रीय रायफलचे तत्कालीन सैनिक हर्षल रामकृष्ण खंडारे यांनी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यासोबत सन २०१६ मध्ये एका मोहिमेमध्ये यशस्वी जबाबदारी पार पडली होती.

सध्या भारताच्या संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये शिरल्याचे ७५ हून अधिक आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप पुणेचे सुभेदार श्रीकृष्ण तानाजी खरडे, उमेश प्रल्हाद अळसकार, ज्ञानेश्वर नामदेव खराडे, विष्णू महादेव वसतकार, मराठा इन्फंट्रीचे रघुनाथ जयराम कठाळे, उमेश देवीदास निमकंडे, सुदर्शन देवनाथ बगाडे, हर्षल रामकृष्ण खंडारे, इलेक्ट्रिक मेकॅनिकल ग्रुपचे नीलेश प्रल्हाद अळसकार, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल रवींद्र भास्कर गावंडे, मंगेश जगन्नाथ राऊत, दिनकर यल्लाप्पा खर्डे, सीआरपीएफचे हेडकॉन्स्टेबल संजय मधुकर रौंदळे, सुभाष नारायण बळकार, महार रेजिमेंटचे अमोल रवींद्र इंगळे, साहेबराव गवई, इंडो तिबेट पोलीस वीरेंद्र निरंजन गवई, सिध्दार्थ उगले यांच्यासह शिर्ला गावातील अनेक जण भारतातील देशाच्या चारही बाजूंच्या सीमेवर त्याबरोबरच संरक्षण दलातील अनेक ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत.

मे- जुलैदरम्यान सन १९९९ मध्ये जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात लष्करी संघर्ष झाला होता तेव्हा कारगिल युद्धात शेकडो पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवून भारताची जमीन पाकिस्तानला हस्तगत करता आली नाही. यात शिर्लासह भारतातील सैनिकांची जी अनमोल कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे त्या ऑपरेशन विजयमधील सैनिकांना सलामी!