शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी

By admin | Updated: May 28, 2016 01:48 IST

कांदा चाळ शेतक-यांसाठी आधार : १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवण.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा)राज्यात मागील वर्षी जवळपास सात लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते. कांदा उत्पादनात सातत्याने वाढ होत असून, योग्य प्रकारे साठवण न केल्यास ५0 ते ६0 टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळ योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक झाली आहे. आधीच निसर्गाची अवकृपा आहे. त्यात कसाबसा जगवलेला कांदा दुष्काळात आधार देईल, अशी भावना मनात असताना कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणार्‍या किमतीमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती; मात्र आता कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ठोक बाजारात कांद्याची किंमत जवळपास ५00 रुपये क्विंटलवर येऊन पोहोचली आहे. सध्या व्यापार्‍यांकडून केवळ चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामध्ये कांदा उत्पादनासाठी शेतकर्‍यांना लागलेला खर्चही भरून निघणार नाही. कांदा हे नाशवंत पीक आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने साठवले नाही, तर त्याची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्री करतात; परंतु कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि तो जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळीचा योग्य पर्याय शेतकर्‍यांपुढे आहे. कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. कांद्याचे दर वाढणे किंवा अचानक कमी होणे याचे एक कारण कांद्याच्या साठवणक्षमतेत आहे. आजही बहुतांश शेतकरी कांदा चाळ योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत. त्याचा फटका बाजारभावातील चढ-उतारात सगळ्यांनाच बसतो. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ६0 टक्के कांदा हा रब्बी हंगामात म्हणजेच एप्रिल ते मेमध्ये तयार होत असून, सध्या बाजारात नवीन कांदा आलेला आहे. एकाच वेळी हा कांदा बाजारात आला की, भाव पडतात; पण तो दोन-तीन महिने कांदा चाळीत साठवला, तर जून ते ऑक्टोबरपर्यंत टिकतो. या काळात कांद्याला चांगला दर मिळतो.