शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी

By admin | Updated: May 28, 2016 01:48 IST

कांदा चाळ शेतक-यांसाठी आधार : १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवण.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा)राज्यात मागील वर्षी जवळपास सात लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते. कांदा उत्पादनात सातत्याने वाढ होत असून, योग्य प्रकारे साठवण न केल्यास ५0 ते ६0 टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळ योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक झाली आहे. आधीच निसर्गाची अवकृपा आहे. त्यात कसाबसा जगवलेला कांदा दुष्काळात आधार देईल, अशी भावना मनात असताना कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणार्‍या किमतीमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती; मात्र आता कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ठोक बाजारात कांद्याची किंमत जवळपास ५00 रुपये क्विंटलवर येऊन पोहोचली आहे. सध्या व्यापार्‍यांकडून केवळ चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामध्ये कांदा उत्पादनासाठी शेतकर्‍यांना लागलेला खर्चही भरून निघणार नाही. कांदा हे नाशवंत पीक आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने साठवले नाही, तर त्याची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्री करतात; परंतु कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि तो जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळीचा योग्य पर्याय शेतकर्‍यांपुढे आहे. कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. कांद्याचे दर वाढणे किंवा अचानक कमी होणे याचे एक कारण कांद्याच्या साठवणक्षमतेत आहे. आजही बहुतांश शेतकरी कांदा चाळ योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत. त्याचा फटका बाजारभावातील चढ-उतारात सगळ्यांनाच बसतो. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ६0 टक्के कांदा हा रब्बी हंगामात म्हणजेच एप्रिल ते मेमध्ये तयार होत असून, सध्या बाजारात नवीन कांदा आलेला आहे. एकाच वेळी हा कांदा बाजारात आला की, भाव पडतात; पण तो दोन-तीन महिने कांदा चाळीत साठवला, तर जून ते ऑक्टोबरपर्यंत टिकतो. या काळात कांद्याला चांगला दर मिळतो.