शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी

By admin | Updated: May 28, 2016 01:48 IST

कांदा चाळ शेतक-यांसाठी आधार : १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवण.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा)राज्यात मागील वर्षी जवळपास सात लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते. कांदा उत्पादनात सातत्याने वाढ होत असून, योग्य प्रकारे साठवण न केल्यास ५0 ते ६0 टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळ योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पश्‍चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक झाली आहे. आधीच निसर्गाची अवकृपा आहे. त्यात कसाबसा जगवलेला कांदा दुष्काळात आधार देईल, अशी भावना मनात असताना कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणार्‍या किमतीमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती; मात्र आता कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ठोक बाजारात कांद्याची किंमत जवळपास ५00 रुपये क्विंटलवर येऊन पोहोचली आहे. सध्या व्यापार्‍यांकडून केवळ चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामध्ये कांदा उत्पादनासाठी शेतकर्‍यांना लागलेला खर्चही भरून निघणार नाही. कांदा हे नाशवंत पीक आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने साठवले नाही, तर त्याची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्री करतात; परंतु कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि तो जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळीचा योग्य पर्याय शेतकर्‍यांपुढे आहे. कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. कांद्याचे दर वाढणे किंवा अचानक कमी होणे याचे एक कारण कांद्याच्या साठवणक्षमतेत आहे. आजही बहुतांश शेतकरी कांदा चाळ योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत. त्याचा फटका बाजारभावातील चढ-उतारात सगळ्यांनाच बसतो. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ६0 टक्के कांदा हा रब्बी हंगामात म्हणजेच एप्रिल ते मेमध्ये तयार होत असून, सध्या बाजारात नवीन कांदा आलेला आहे. एकाच वेळी हा कांदा बाजारात आला की, भाव पडतात; पण तो दोन-तीन महिने कांदा चाळीत साठवला, तर जून ते ऑक्टोबरपर्यंत टिकतो. या काळात कांद्याला चांगला दर मिळतो.