शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

५0 हजारात विजयाचा धनी!

By admin | Updated: October 8, 2014 01:09 IST

पंचरंगी लढतीमुळे पुन्हा १९९९ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचा कयास.

अकोला- राज्यात १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यावेळी विजयी उमेदवारांना मिळालेली मतं ३५ ते ५0 हजारांच्या घरात होती. आता १५ वर्षांंनंतर पुन्हा एकदा या दोन पक्षांसोबतच शिवसेना आणि भाजप हे युतीतील दोन पक्षही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच जिल्ह्यात भारिप-बमसं या पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढवित असल्याने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात पंचरंगी लढतीचे तर काही मतदारसंघात तुल्यबळ अपक्षांमुळे बहुरंगी लढतीची शक्यता आहे. मतदारांच्या संख्येसोबतच उमेदवारांची संख्याही वाढली असल्याने १५ वर्षांपूर्वीचाच आकड्यांचा खेळ यावेळीही बघावयास मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून १९९९ मध्ये स्व तंत्र निवडणूक लढविली होती. त्यानंतरच्या निवडणुका या दोन पक्षांनी आघाडी करून लढल्यात. आता १५ वर्षांंची आघाडी फुटली. त्यामुळे स्वतंत्र लढत असलेल्या या दोन पक्षांसोबतच युतीतही फूट पडल्याने प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे. त्यासोबतच आकोट, बाळा पूर आणि मूर्तिजापूर या तीन मतदारसंघात लाखाच्यावर नवीन मतदारांची भर पडली असून, अकोला पश्‍चिम आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघातील सरासरी ६५ हजारांपेक्षा अधिक नावं मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी या मतांचे दावेदारही यावेळी वाढले आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्याने विजय मिळविण्यासाठी आवश्यक मतांची सं ख्याही घटणार आहे. १९९९ मध्ये बोरगाव मंजू आणि अकोला वगळता इतर मतदारसंघात विजय मिळविणार्‍या उमेदवारांना ३५ ते ४0 हजारांच्या घरात मतं मिळाली होती. बोरगाव मंजूमध्ये भारिप- बमसंच्या तिकिटावर लढणारे डॉ. दशरथ भांडे यांनी ५१३२९ मतं मिळवून शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार विजय मालोकार यांच्याविरुद्ध १0 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला होता. तत्कालीन अकोला आणि आताच्या अकोला पूर्व मतदारसंघात १९९९ च्या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांनी ५१६४६ मतं मिळविली होती. यावेळी या पाचही मतदारसंघातील तुल्यबळ लढती बघता १९९९ च्या मतांचेच गणित पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये एकत्र लढणारे शिवसेना व भाजपही यावेळी स्वतंत्र लढत आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बसपा, एमडीपी, सपा, रि पाइं आणि काही मतदारसंघात प्रबळ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे यावेळी विजयी उमेदवारांचे गणितं ४५ ते ५0 हजारांच्या घरातच राहण्याची दाट शक्यता आहे. मताधिक्याचा विचार केला तर अकोला आणि मूर्तिजापूर हे दोन मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघा त विजयी उमेदवाराचे मताधिक्य सरासरी १0 हजारांच्या घरात होते. अकोला मतदारसंघातून गोवर्धन शर्मा यांना २५१५ तर मूर्तिजापूरमध्ये संजय धोत्रे यांना ४७00 मतांनी विजय मिळाला होता. आता २0१४ च्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघात पंचरंगी लढती होणार आहेत. काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये काही मतदारसंघात दिग्गजांना निसटता विजय मिळाला होता. काही मतदारसंघात आताची परिस्थितीसुद्धा तशीच आहे.