शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

साईसंस्थानचा ‘यू टर्न’

By admin | Updated: June 21, 2014 00:45 IST

शिर्डी : पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या भाविकांचा शुक्रवारी दिवसभर व्यक्त होणारा रोष बघून पाण्याची बाटली संवेदनशील व धोकादायक नसून जीवनावश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़

शिर्डी : पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या भाविकांचा शुक्रवारी दिवसभर व्यक्त होणारा रोष बघून पाण्याची बाटली संवेदनशील व धोकादायक नसून जीवनावश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़ यामुळे रात्री याप्रश्नी यू टर्न घेत मंदिरात पाण्याच्या बाटल्या नेण्यावरील बंदी हटविण्यात आली़ याबरोबरच याप्रश्नी दोषी धरुन निलंबित करण्यात आलेल्या तेरा कर्मचाऱ्यांवरील कारवाईही आपोआप संपुष्टात आली़मंदिरातील रिकाम्या बाटल्या बघून स्वच्छतेच्या कारणास्तव आपण सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या़ मात्र त्याचा वेगळाच अर्थ घेऊन संबंधितांनी थेट पाण्याच्या बाटल्यावरच बंदी आणली़ शुक्रवारी ही बाब समोर आल्याने आपण प्रत्यक्ष पहाणी करुन हा प्रकार तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले़याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ यावेळी उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब साबळे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते़गैरसमज व समन्वयाच्या अभावातून झालेल्या या प्रकारामुळे भाविकांना गेले दोन दिवस जो त्रास झाला त्याबद्दलही सोनवणे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे़ ज्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या जमा करण्यात येत होत्या, तेथे आता स्वच्छेतेच्या कारणास्तव केवळ रिकाम्या बाटल्या जमा करण्यात येतील, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले़ गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी आणण्यात आली होती़ मंदिरात बाटल्या आढळल्याने तेरा कर्मचाऱ्यांना आठ दिवसांसाठी निलंबितही करण्यात आले होते़ ‘लोकमत’ने या विषयाला आज वाचा फोडली़ भाविकांनीही दिवसभर या निर्णया विरोधात आक्रोश व्यक्त केला़ परिणामी रात्री नऊच्या सुमारास प्रशासनाने यू टर्न घेत या अन्यायकारक निर्णयाला मुठमाती दिली़ (वार्ताहर)