शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

साखर कारखाने बंद पाडून दारूच्या कारखान्याला पाणी

By admin | Updated: July 12, 2014 01:10 IST

अहमदनगर: मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हवे आहे, ते त्यांना दिले पाहिजे. मात्र, आमचे साखर कारखाने बंद पाडायचे आणि त्यांच्या दारूच्या कारखान्यांना पाणी द्यायचे हा कुठला न्याय.

अहमदनगर: मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हवे आहे, ते त्यांना दिले पाहिजे. मात्र, आमचे साखर कारखाने बंद पाडायचे आणि त्यांच्या दारूच्या कारखान्यांना पाणी द्यायचे हा कुठला न्याय. मुळात राज्याच्या राजकारणात नगरचा प्रभाव कमी झाला असून यामुळे जिल्ह्याचे हक्काचे पाणी पळविले जात आहे. या हक्काच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीत एकाकीपणे लढत असलो तरी, हा प्रश्न तडीस लावणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी व्यक्त केला.नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या परिस्थिती बाबत कोल्हे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, ज्येष्ठ संचालक तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग उपस्थित होते.कोल्हे म्हणाले की, चार वर्षापासून नगर, नाशिक विरूध्द मराठवाड्याचा पाण्यावरून वाद सुरू आहे. मुळात जायकवाडी धरणच चुकीचे असून ज्या धरणाची क्षमता २३.७२ टीएमसी असतांना ते १०० टीमएमसी पर्यंत कोणी नेले याचा खुलासा कोणीच करत नाही. २००१ आणि २००८ मध्ये राज्य सरकारच्या रेखांकन विभागाने केलेल्या सर्व्हेत ही माहिती उजेडात आलेली आहे. जायकवाडी पाणी प्रश्नी उच्च न्यायालय आणि नेमण्यात आलेल्या प्राधिकरणासमोर सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने गोदावरी खोऱ्यातील जलनियामनासंदर्भात हिरालाल मेंढेगिरी समिती नेमली आहे. या समितीने जायकवाडीला २२. ५ टीएमसी पाणी सोडले पाहिजे असा अहवाल दिला आहे. हा अहवाल स्वीकारल्यास जिल्ह्यातील १४ साखर कारखाने बंद पडतील. या कारखान्यांवर असणारे २८ हजार कामगार आणि २ लाख ऊस तोडणी मजुरांचे काय होणार असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. हे पाणी पिण्यासाठी नव्हे, तर दारूच्या कारखान्यांना पाहिजे आहे. यासाठी दारू कारखानदार लॉबी पैसा पुरवत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. दुसरीकडे गोदावरी मराठवाडा महामंडळ नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या विरोधात काम करत असून अनेक वर्षापासून या महामंडळाचे कार्यालय नाशिक या ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्याकडेही राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जायकवाडी पाणी प्रश्नी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याशी या प्रश्नी बोललो असून त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचे सांगितले आहे. उर्वरित दोन्ही मंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या प्रश्नी सध्या राष्ट्रवादी पक्षात आपण एकाकी पडलो असलो तरी पक्षावर नाराज नाही. कारण पक्षाच्या मंत्र्यांकडून मला हा प्रश्न सोडवून घ्यावयाचा आहे. यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. गोदावरी खोऱ्यात सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशाला महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. या वाळू माफीयांकडे हत्यारे असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला.कोण विखे?माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी या पाण्याचे समान वाटप व्हावे, असे सुचविले होते. याबाबत कोल्हे यांच्याकडे विचारणा केली असता, कोण विखे? ते एका मंत्र्यांचे वडील आहेत, असे सांगत मला त्यांच्या गावाला जायचे नाही असे म्हणत विखेंच्या भूमिकेची खिल्ली उडविली. तसेच या प्रश्नी जिल्ह्यातील सर्व नेते उशीरा का होईना, मला मदत करतील असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.