शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

‘आर्द्रा’वर भिस्त

By admin | Updated: June 22, 2014 00:19 IST

अहमदनगर : मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत.

अहमदनगर : मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. नगर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पेरण्या सुरू झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील पेरण्यांची टक्केवारी एक टक्क्यांच्या पुढेही सरकलेली नाही. रविवार (आज) पासून आर्द्रा नक्षत्र सुरू होत असून त्यावर खरिपाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.गेल्या वर्षी २९, ३० मे आणि १ जूनला झालेल्या दमदार पावसावर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. जून महिन्यात पावसाळ्यातील सरासरी २० टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र, आतापर्यंत आशादायक चित्र नाही. नगर शहर आणि तालुक्यातील काही भाग वगळता अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गेल्या काही वर्षापासून पावसाच्या सुरूवातीला पाऊस पडत नसल्याने खरिपाचे नियोजन कोलमडताना दिसत आहे.या हंगामात प्रामुख्याने बाजारी, कपाशी, सोयाबीन यासह दक्षिण जिल्ह्यात कडधान्यांची पिके घेतली जातात. कडधान्यासाठी सरासरी १५ ते २० जून पर्यंत झालेल्या पावसावर कडधान्य पिकांचे भवितव्य ठरत असते. पावसाअभावी यंदा जिल्ह्यातील कडधान्य पिकाचे क्षेत्र घटणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उशीरा जरी पाऊस झाला तर या पिकाऐवजी अन्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. मृग नक्षत्र सुरूवातीला जिल्ह्यात पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झालेला आहे. मृग जवळजवळ कोरडा गेल्याने आता आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. आर्द्रा नक्षत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात झालेला पाऊस असा अकोले (१.४२), संगमनेर (१.०१), राहुरी (०.८३), नेवासा (०.५६), कोपरगाव (१.१४), राहाता (४.९), श्रीरामपूर (२.५५), नगर (१४.८८), शेवगाव (६.९३), पाथर्डी (१६.५२), पारनेर (२.५३), कर्जत (४.१६), श्रीगोंदा (७.३६), जामखेड (१२.३६) यांचा समावेश आहे. पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील कडधान्य पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मात्र, त्याऐवजी बाजारी, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. येत्या २५ तारखेनंतर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बागायत भागात कपाशीची लागवड सुरू झाली आहे.-अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी