शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

‘मुळा’त पाणी आलेच नाही

By admin | Updated: June 30, 2014 00:34 IST

राहुरी : मुळा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिना दुर्दैवी ठरला आहे़ १९७० पासून धरणात पहिल्यांदाच पाण्याची आवक शून्य अर्थात भोपळा ठरली आहे़

राहुरी : मुळा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिना दुर्दैवी ठरला आहे़ १९७० पासून धरणात पहिल्यांदाच पाण्याची आवक शून्य अर्थात भोपळा ठरली आहे़ पाणलोट क्षेत्रात पावसाने अंगठा दाखविल्याने पाण्याची पातळी चिंताजनक बनली आहे़पाणलोट क्षेत्रावर असलेल्या क ोतूळ येथे पावसाळ्यात ९५० ते ११०० मिलीमिटर पाऊस पडतो़ येथील पावसावरच धरणाचे भवितव्य अवलंबून असते़ मागील वर्षीही क ोतूळ येथे १०५७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती़ मे २०१४ मध्ये कोतूळ येथे ४० मिलीमिटर पावसाची नोंद झाली़ मात्र पाणी जमिनीत मुरल्याने धरणापर्यंत थेंबही येऊ शकलेला नाही़मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर कमी पाऊस झाला तर धरणाकडे पाणी येत नाही़ त्यासाठी किमान ११० मिलीमिटर पावसाची गरज असते़ तेवढा पाऊस जून महिन्यात अद्याप पडलेला नाही़ पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ यंदा जून महिन्यात २०० मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस पाणलोट क्षेत्रावर पडेल व पाण्याची आवक सुरू होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता़ मात्र अंदाजावर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांचे नियोजन फिस्कटले आहे़२६००० दश्लक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ५०९३ दश्लक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ २० टक्के पाणी शिल्लक दिसत असले तरी त्यापैकी ४५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृत आहे़ केवळ ५९३ दश्लक्ष घनफूट पाणी उपयुक्त आहे़ पाण्याची पातळी खाली जात असल्याने मुळा धरणावर शेतकऱ्यांनी टाकलेल्या वीज पंपांचे जोड तोडण्याची मोहीम पाटबंधारे खात्याने हाती घेतली आहे़ (तालुका प्रतिनिधी)मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर जून महिन्यात २०० मिलीमिटर पाऊस अपेक्षित होता़ प्रत्यक्षात पावसाने हजेरी न लावल्याने यंदा जूनमध्ये पाण्याची आवक शून्य आहे़ धरणात पाणी साठवण्यास सुरूवात झाल्यापासून या महिन्यात पहिल्यांदाच पाणी येऊ शकलेले नाही़ येत्या तीन महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर धरणाच्या पाण्याची पातळी अवलंबून आहे़-आऱ एम़ कांबळे, मुळा धरण, शाखा अभियंतामुळा परिसरात हाय अ‍ॅलर्टपाटबंधारे खात्याने जलाशयातील शेतीसाठी मोटारीव्दारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेतली असून, धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा चालविला आहे़ आत्तापर्यंत ८६ मोटारींचा उपसा बंद करण्यात आला असून, उर्वरित ८० विद्युत मोटारींचा विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे शाखा अभियंता आऱ एम़ कांबळे यांनी सांगितले़नियम काय सांगतोकोणत्याही जलाशयातून केवळ रब्बीसाठीच थेट धरणातून मोटारीव्दारे पाणी घेण्यास परवानगी आहे़ या काळात शेतकरी धरणात मोटारी टाकून पाणी उपसा करू शकतात़ परंतु उन्हाळ्यात असे पाणी घेण्यास बंदी आहे़ उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे, असा नियम आहे़ मात्र उन्हाळ्यात देखील मोठ्याप्रमाणात मोटारींव्दारे सर्रास पाणी उपसा केला जातो़या गावांना बसणार फटकाबारगाव, आंग्रेवाडी, पळशी, चास, वनकुटी, जांभळी, जांभूवन, वरवडी या गावांना फटका बसणार आहे़१६६ विद्युत मोटारींद्वारे पाणी उपसामुळा धरणात १६६ मोटारी बसविण्यात आल्या आहेत़ या मोटारींव्दारे पाणी उपसा सुरू आहे़ परंतु आता धरणातच पाणी न राहिल्याने मोटारी काढण्यात येत असून, काहींचा वीज पुरवठा खंडीत केला आहे़शेतकऱ्यांनी बसविलेल्या मोटारीच बंद करण्यात येत असल्याने पिकांसाठी शेतकऱ्यांना पाणी घेता येणार नाही़ त्यामुळे या शेतकऱ्यांना फटका बसेल़पाणी पातळी खालावलीजीवंत पाणीसाठा- ५९३ दलघफूमृतसाठा- ४५०० दलघफूदररोजचा उपसा- १२ दलघफू