शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

राज्य सरकार कांदा खरेदी करून विकणार

By admin | Updated: May 20, 2016 00:27 IST

संगमनेर : कांदा नुसता खायला विकणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. जोपर्यंत शेती मालावर प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना शेती परवडणार नाही.

संगमनेर : कांदा नुसता खायला विकणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. जोपर्यंत शेती मालावर प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना शेती परवडणार नाही. म्हणून सरकारने टिकणारा कांदा बऱ्या भावाने खरेदी करून ३-४ महिने साठवून तो ‘पणन’मार्फत विकण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार, सार्वजनिक बांधकाम व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. एका कार्यक्रमासाठी गुरूवारी सायंकाळी पाटील हे संगमनेरात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, मागणीपेक्षा पुरवठा अधिक वाढला तर बाजारभाव पडतात, हा मार्केटचा नियम आहे. प्रायोगिक तत्वावर २० शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देण्याचा सरकारचा विचार आहे. पण, तो ग्राहकाला स्वस्तात द्यावा लागेल. हमीभाव देताना सरकारनेच व्याज भरावे लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी यावर एकमत झाले आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त कांदा झाल्याने त्यावर सरकारलाच उपाय शोधावे लागणार आहेत. ‘पणन’च्या माध्यमातून शेती मालावर प्रक्रिया करून हजारो प्रकल्प देणार आहोत. किमान २२ शेतकऱ्यांनी एकत्रित येवून कंपनी स्थापन करावी. या कंपनीमार्फत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पास भाग भांडवल देण्यास सरकार तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले. साखर कारखान्यांना २०१४-१५ सालची एफआरपी २२ हजार कोटी रूपये होती. त्यातील केवळ १०० कोटी राहीले आहेत. साखरेचे दर १ हजार ९०० रूपये इतके खाली येवूनही २१ हजार ६०० कोटी देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यासाठी कारखान्यांना २ हजार ‘सॉफ्ट लोन’ दिले. ते वसूल करण्यासाठी ७ कारखान्यांची जप्ती काढली. आता १५-१६ वर्षात साखरेचे दर खाली आल्याने ८०-२० याप्रमाणे एफआरपी देण्याचा संयुक्त निर्णय शेतकरी संघटना, कारखाने व सरकार यांच्या बैठकीत झाला. त्यातील ८० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्याचे धोरण घेतले आहे. तर उर्वरित २० टक्के एफआरपी गाळप संपल्यावर मे अखेरपर्यंत द्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)