प्रमोद आहेर, शिर्डीपाण्याइतके काहीच अमूल्य नसल्याचे वास्तव दुष्काळाने समोर आले़ साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलयं़ मंदिरात मूर्तीसमोर पाण्याचे जार ठेवून शिर्डीतील कुलूपबंद केलेल्या पाण्याचे मोल देवत्वापेक्षा अधिक असल्याचे द्योतक आहे़शिर्डी सध्या भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे़ संस्थानने पन्नास टक्के भक्तनिवास, प्रसादालयाचे दोन उपविभाग पाण्याअभावी बंद केले आहेत़ पैसे देऊनही संस्थानला गोड पाणी उपलब्ध होत नाही़ फिल्टर असूनही खारे पाणी तोंडातही धरणे अवघड आहे़ भाविकांनाही मिनरल वॉटरच घ्यावे लागते़ शहरात दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे़ संस्थानचे तलावही कोरडे पडले आहेत़ भोजनगृहात पत्रावळीवर जेवण देण्यात येत आहे़ संस्थानला टँकरद्वारे पुरवठा होत असलेले बहुतांश पाणी खारे आहे़ त्यामुळे कर्मचारीही ते पाणी पित नाहीत़ संस्थानच्या नवीन भक्तनिवास (पाचशे रूम) व संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील सुरक्षा रक्षक रोज वर्गणी करून ड्युटीवर पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत आहेत़ पण हे जार बाहेर ठेवले तर कुणीही किंवा वर्गणी न देणाराही पिऊन लगेच संपत आहेत़ यावर या सुरक्षारक्षकांनी तोडगा काढला आहे़ संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सरस्वतीचे मंदिर आहे़ सुरक्षा रक्षकांनी या मंदिरात पाण्याचे जार ठेवून त्याला कुलूप लावले़यामुळे मूर्ती झाकली असून भक्तनिवाससमोर असलेल्या या मंदिरात मूर्तीच्या जागी पाण्याच्या जारचे दर्शन घडत आहे़ एकूणच धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही पाण्याला देवापेक्षा अधिक दर्जा आला आहे. ‘लोकमत’ वृत्ताची दखलयाबाबत शनिवारी ‘लोकमत’ आॅनलाईन आवृत्तीला हे वृत्त प्रसिद्ध होताच साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी मंदिरातील जार तेथून हलवल्याच्या सूचना दिल्या.
साईनगरीत पाण्याला आले देवत्व
By admin | Updated: June 11, 2016 23:48 IST