शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शेवगाव, पाथर्डीत सरासरीच्या सव्वाशे टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

अहमदनगर : गत महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस हा सरासरीच्या ६० ते ६५ टक्के इतकाच होता. मात्र गत आठवड्यात झालेल्या ...

अहमदनगर : गत महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस हा सरासरीच्या ६० ते ६५ टक्के इतकाच होता. मात्र गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी ९१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यात चार तालुक्यांमधील पाऊस सरासरीच्या ९० टक्के इतका झाला आहे, तर दक्षिण भागातील पारनेर, जामखेड आणि कर्जत या तीन तालुक्यांमधील पावसाची टक्केवारी सरासरीच्या ७५ टक्के इतकी आहे. सर्वाधिक पाऊस शेवगाव व पाथर्डी तालुक्यात असून पावसाची ही टक्केवारी सव्वाशे टक्के आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गत आठवड्यात जिल्ह्यातील दक्षिण भागात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना पूर आले. जनावरे वाहून गेली. नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस ९१ टक्के इतका झाला आहे. गतवर्षी ५ सप्टेंबरपर्यंत १६७ टक्के इतका पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे दिसले.

शनिवारी जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा शेवगाव, पाथर्डी, नगर या तीन तालुक्यांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. बीड-अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या भागात मोठा पाऊस झाल्याने जामखेड तालुक्यातील नद्या-नाल्यांनाही पूर आला. शनिवारी नगर (३२.२), पारनेर (१७.७), श्रीगोंदा (३२.४), कर्जत (२८.८), जामखेड (३३.६), शेवगाव (५२.८), पाथर्डी (५८.१), नेवासा (३३.४), राहुरी (१५.६), संगमनेर (७.३), अकोले (६.५), कोपरगाव (५३.), श्रीरामपूर (१४.५), राहाता (८.०). असा एकूण सरासरी २४.६ मि.मि. इतका पाऊस झाला.

जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ४४८ मि.मी. इतकी आहे. यंदा आतापर्यंत ४०९ मि.मि. इतका पाऊस झाला आहे. ही टक्केवारी सरासरीच्या ९१ टक्के इतकी आहे. गतवर्षी याचवेळी सरासरीच्या १६७ टक्के इतका पाऊस झाला होता.

------------

आतापर्यंत झालेला पाऊस (सरासरीच्या टक्के)

तालुका टक्के

अहमदनगर ८८.५

पारनेर ७४.१

कर्जत ७६.५

जामखेड ७७.३

शेवगाव १११.६

पाथर्डी १३४.९

नेवासा ८९.२

राहुरी ९१.१

संगमनेर ८०.९

अकोले ११२.५

कोपरगाव ९९.९

श्रीरामपूर ९२.३

राहाता ७३.०

एकूण ९१.३

---------------------

अतिवृष्टीचा पुन्हा इशारा

५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत गटगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सर्वदूर पावसाचा इशारा दिला आहे. नगर जिल्ह्यात ५, ६ आणि ७ सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.