शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेलार यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: June 23, 2014 00:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेस: विधानसभा लढविण्याचे संकेत

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पडझड होण्याची चिन्हे आहेत़ पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले़ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगून शेलार यांनी विधानसभेचे रणशिंग यावेळी फुंकले़स्वाभिमानाची हाक देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली़ स्वाभिमानाची हाक दिल्याने शिवसेना व भारतीय जनता पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबुत दाखल झाले़ परंतु भाजपाच्या नेत्यांच्या पदरी उपेक्षाच आली़ त्यांना कोणतीही पदे मिळाली नाहीत़ प्रामाणिकपणे काम करूनही पक्षात अन्याय झाल्याचे सांगून शेलार यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच हल्ला चढविला़ या पक्षाची कार्यपध्दतीच वेगळी आहे़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना महत्व दिले जाते़ कुकडीचे पाणी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील यांच्याशी दोन हात करावे लागले़ वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली़ मात्र दखल घेतली गेली नाही़ साकळाई प्रकल्प व विधानपरिषद, या दोन्ही ठिकाणी उपेक्षा पदरी आली असून, पक्षात अन्याय झाल्याने राजीनामा देत आहे, असे शेलार म्हणाले़शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष केला़ कुकडीच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलो़ हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वरिष्ठांनी दिले होते़ मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही़ श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत़ याबाबत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते अत्यंत बेफिकिरीने वागतात़ लोकसभा निवडणुकीत गांधी यांना मताधिक्य देऊन श्रीगोंद्यातील मतदारांनी पाचपुते यांच्यावरील नाराजी व्यक्त केली आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र दिसेल, असेही शेलार म्हणाले़ पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय, असे पत्रकारांनी विचारले असता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याचे ते म्हणाले़ मात्र कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार, ते योग्य वेळ आल्यानंतर जाहीर करू, अजून बऱ्याच घडामोडी घडतील, असे सांगून इतर पक्षाच्या प्रवेशाबाबत बोलण्याचे टाळले़ (प्रतिनिधी)