शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शेलार यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: June 23, 2014 00:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेस: विधानसभा लढविण्याचे संकेत

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पडझड होण्याची चिन्हे आहेत़ पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले़ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगून शेलार यांनी विधानसभेचे रणशिंग यावेळी फुंकले़स्वाभिमानाची हाक देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली़ स्वाभिमानाची हाक दिल्याने शिवसेना व भारतीय जनता पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबुत दाखल झाले़ परंतु भाजपाच्या नेत्यांच्या पदरी उपेक्षाच आली़ त्यांना कोणतीही पदे मिळाली नाहीत़ प्रामाणिकपणे काम करूनही पक्षात अन्याय झाल्याचे सांगून शेलार यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच हल्ला चढविला़ या पक्षाची कार्यपध्दतीच वेगळी आहे़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना महत्व दिले जाते़ कुकडीचे पाणी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील यांच्याशी दोन हात करावे लागले़ वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली़ मात्र दखल घेतली गेली नाही़ साकळाई प्रकल्प व विधानपरिषद, या दोन्ही ठिकाणी उपेक्षा पदरी आली असून, पक्षात अन्याय झाल्याने राजीनामा देत आहे, असे शेलार म्हणाले़शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष केला़ कुकडीच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलो़ हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वरिष्ठांनी दिले होते़ मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही़ श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत़ याबाबत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते अत्यंत बेफिकिरीने वागतात़ लोकसभा निवडणुकीत गांधी यांना मताधिक्य देऊन श्रीगोंद्यातील मतदारांनी पाचपुते यांच्यावरील नाराजी व्यक्त केली आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र दिसेल, असेही शेलार म्हणाले़ पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय, असे पत्रकारांनी विचारले असता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याचे ते म्हणाले़ मात्र कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार, ते योग्य वेळ आल्यानंतर जाहीर करू, अजून बऱ्याच घडामोडी घडतील, असे सांगून इतर पक्षाच्या प्रवेशाबाबत बोलण्याचे टाळले़ (प्रतिनिधी)