शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: July 1, 2014 00:15 IST

अहमदनगर : राज्याच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सिंचन क्षमतेत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अहमदनगर : राज्याच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सिंचन क्षमतेत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी ज्वारी, खरिपातील बाजरीच्या क्षेत्रात लक्षणीय घट आली आहे. सूक्ष्म सिंचनात सर्वाधिक वापर ठिबकचा होत आहे. ठिबक सिंचनावर ऊस, डाळिंब बागांचे प्रमाण वाढले असून दरवर्षी ठिबक सिंचनाचे क्षेत्र १२ ते १५ हेक्टरने वाढत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.जिल्ह्यात १ हजार ५८५ गावे असून खरीप हंगामाची ५७९ तर रब्बी हंगामाची १ हजार ६ गावे आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १७.२ लाख हेक्टर असून लागवडीखाली क्षेत्र १३ लाख ५९ हजार आहे. खरीप हंगामासाठी ४ लाख १२ हजार तर उन्हाळी- रब्बी हंगामासाठी ७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. कमी कालावधीत जास्तीतजास्त उत्पन्न मिळवून देणारे आणि नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीन, कापूस, मका पिकांच्या क्षेत्रात अलीकडच्या पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला २० हजार हेक्टरच्या जवळपास कापसाचे क्षेत्र होते. त्यानंतर त्याची सरासरी ६० हजार हेक्टरपर्यंत पोहचली तर २०१३-१४ मध्ये दीड लाख हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र वाढत गेले. ३० हजार हेक्टरपर्यंत असणारे सोयाबीनचे क्षेत्र ७६ हजार हेक्टरपर्यंत पोहचले असून चारा पीक असणाऱ्या मका पिकाचे क्षेत्र ५६ हजार हेक्टर झाले आहे.जिल्ह्यात मुळा, भंडारदरा ही प्रमुख धरणे असून पुणे जिल्ह्यातील घोड, कुकडीचे पाणी श्रीगोंदा, पारनेर, कर्जत आणि जामखेडला मिळते. या शिवाय पाच ते सहा मध्यम प्रकल्प असून नाशिक आणि मराठवाड्यातून काही प्रमाणात शेतीला पाणी मिळते. पाच वर्षापूर्वी जिल्ह्याची सिंचन क्षमता २१ टक्के होती. आता त्यात वाढ झाली असून २८ टक्के सिंचन क्षमता झालेली आहे.यात लिप्ट इरिगेशन, शेततळी आणि प्रत्यक्ष सिंचनाचे प्रकार आहे. जिल्ह्यात दहा हजारांच्या जवळपास शेततळी असून त्यातील चार हजार शेतळ्यांची नोंद झालेली आहे. यातून समारे ५ हजार ५० हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आहे. वांबोरी चारी, कालवे, तलाव, बंधारे यांच्या माध्यमातून विहिरींच्या पाणी क्षमतेत वाढ झालेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण ठिबकचे असून १ लाख हेक्टर क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून भिजवले जात आहे. दर वर्षी या क्षेत्रात १२ ते १५ हजार हेक्टरने वाढ होत आहे. विशेष करून उसासाठी ठिबकचे प्रमाण वाढले असून त्यातून मोठी पाणी बचत होत आहे. कापसासाठी ठिबक वापरण्याचा कल वाढला आहे.शेततळी आणि डाळिंब असे समीकरण झाले असून राहुरी, शेवगाव, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, राहाता या तालुक्यात शेततळी, ठिबक आणि डाळिंबाच्या बागांचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र ६८ हजार हेक्टर असून त्यात १७ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. (प्रतिनिधी)गत वर्षी जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या पावसाच्या कालखंडात ४९५ मिमी सरासरीच्या तुलनेत ५१९ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या १३५ टक्के पाऊस झालेला आहे. सर्वसाधारण माहिती खरिपाची गावे ५४९रब्बीची गावे १००६ पाटपाण्या खालील क्षेत्र ६५ हजार हेक्टर बागायत क्षेत्र २ लाख ६० हेक्टरजमिनीचे प्रकार हलक्या प्रतीची जमीन २४ टक्के मध्यम प्रकारची जमीन ३८ टक्केभारी काळी जमीन ३६ टक्केतांबडी जमीन २ टक्केपीकनिहाय क्षेत्रऊस १ लाख ६० हजार हेक्टरभाजीपाला पीक ३० ते ४० हजार हेक्टरचारा पिके ४० हजार हेक्टरकांदा पीक ७६ हजार हेक्टरफळबागा ६८ हजार हेक्टरमका ५६ हजार हेक्टर सोयाबीन ५६ हजार हेक्टर कापूस १ लाख हेक्टरच्या पुढे